दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ३०० भारतीयांची केंद्र सरकारने जासूसी केल्याचा आरोप, विरोधकांनी मोदी सरकारवर केला असून, हॅकिंगद्वारे या सर्वांवर पाळत ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या ३०० मध्ये ४० पेक्षा जास्त पेशाने पत्रकार असून, न्यायाधीश, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि उद्योगपती आहेत, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
धक्कादायक! मोदी सरकारचा देशाच्या सुरक्षेशी खेळ? विरोधकांनी केला हेरगिरीचा भांडाफोड
दरम्यान, यावरून काल संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ झाल्यानंतर, आज भाजपच्या संसदीय समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी, देशातील महामारीच्या परिस्थितीसंबंधी विरोधकांकडून खोटी माहिती पसरवली जात असून, त्याला उत्तर द्या असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षातील खासदारांना दिला आहे. तसेच, “काँग्रेसचं अस्तित्व संपत आलं, तरी त्यांना आमचीच चिंता आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
PM Modi asks BJP MPs to defeat Cong lies with truth, make people aware about govt work
Read @ANI Story | https://t.co/CT9y49kCSH pic.twitter.com/gV1PLMDCgQ
— ANI Digital (@ani_digital) July 20, 2021
“काँग्रेसनेही कायम केला आहे यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर”, भाजपने आकडेवारी देत केला गंभीर आरोप
तसेच, “आपण महामारीच्या सगळ्या परिस्थितीतून प्रयत्नपूर्वक इथपर्यंत आलो आहोत आणि ते या कोमामधून अजूनही बाहेर आलेले नाहीत. विरोधी पक्षाचं असं वागणं हे दुर्दैवी आहे. त्यांना त्यांच्या मतदारांची काळजी नाही. या देशावर त्यांनी ६० वर्ष राज्य केलं. पण त्यांच्या डोक्यात अजूनही तेच आहे. निवडणुकांमध्ये हरल्यानंतरही आक्रमक आणि जबाबदारीची जाणीव असलेला एक विरोधी पक्ष म्हणून त्यांनी पुढे येणं अपेक्षित होतं, मात्र तसं होताना दिसत नाही,” अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे.
Delhi: BJP all-MP meeting underway at Parliament, in the presence of PM Modi
Visuals from inside pic.twitter.com/RJSXdkJ60j
— ANI (@ANI) July 20, 2021
का होतोय केंद्रावर नागरिकांची हेरगिरीचा केल्याचा आरोप? काय आहे नेमकं ‘पेगासेस’ प्रकरण; वाचा थोडक्यात
आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असून, आजच्या दिवशी महागाई, ३ कृषी कायदे, शेतकरी आंदोलन, सीमेवर सुरु असेलल्या हालचाली, देशातील महामारीची परिस्थिती आणि आता उपास्थित झालेला ‘पिगॅसस प्रोजेक्ट’चा मुद्दा यावर विरोधकांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जाण्याची शक्यता आहे.
Read Also :
- मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवलं; अदानींचा मोठा निर्णय
- भाजप-राष्ट्रवादीच्या दोन युवा नेत्यांमध्ये जुंपली, फडणवीसांवरच्या टीकेला दिले ‘गावरान तुपाने’ प्रत्युत्तर
- आरक्षण मिळवून न देण्यामागे ‘या’ नेत्यांचा हात, भाजपने उघड केली झारीतील शुक्राचार्यांची नावे
- मनसेने महापालिकेला घोषीत केले ‘कैलासवासी पुणे महानगरपालिका’ ; सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ कारभारावर निशाना
- पंकजांना डावलून प्रदेश भाजपची जोरदार बैठक; प्रश्नांची झोड उठताचं प्रवक्त्यांकडून पांघरण घालण्याचा प्रयत्न