मुंबई : आगामी महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने रणनीती आखली आहे. येत्या महिन्यापासून संपुर्ण महाराष्ट्रातील जिल्हा मध्ये महाविकास आघाडीच्या जाहीर सभा होणार आहेत. यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये सभांबाबत योजना आखण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
हेही वाचा…“तीन वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत राज्यपालांनी कसा मोडला?”, कोर्टात वारे फिरले, न्यायाधीशांची महत्त्वाची टिप्पणी
भाजपने देशात हिंदुत्व कशी सुरू केलं. रथयात्रा कोणी काढली, अगोदर भाजपचे किती खासदार होते ? दोनाचे ८० झाले, ८० चे १८० झालेत. त्यावेळी अडवाणी पंतप्रधान होऊ शकले असते. तेव्हा त्यांनी भाजपचं नेतृत्व केलं होतं. त्यांच्यासोबत वाजपेयी साहेब देखील सोबत होते. सत्ता उंबरठ्यावर यायला लागली, मग ममता, समता, जयललिता, या सगळ्यांना बोलवण्यात आलं. आम्ही पाठिंबा देऊ परंतु आम्हाला निरपेक्ष चेहरा लागेल. त्यावेळी वाजपेयीचं नाव समोर आलं होतं. तेव्हा मग तुम्ही हिंदुत्व सोडलं होतं का ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
हेही वाचा…“..तर त्यातून सहानुभूतीची लाट निर्माण होईल,” महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उज्वल निकम यांचं मोठं विधान
एनडीए मध्ये किती हिंदुत्ववादी होते, त्यांची यादी द्या. सर्वधर्मभाव होते, त्यांची यादी द्या. मी काही सोडलं पण हिंदुत्व सोडलं नाही. पण काही जण धोतरात गेलं. पाहिजे जेव्हा नेसलं पाहिजे तेव्हा सोडलं. त्यातच आम्ही जे काही काम केलं आहे. ते लोकांना विसरायला लावत आहेत. त्यावर आम्ही केलेलं काम आता विसरून द्यायचं नाही. मला विकाऊ नाही तर लढाऊ लोक पाहिजेत असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
Read also
- हेही वाचा…“मग एकनाथ शिंदे कोण आहेत? उद्या कोणीही उठेल आणि म्हणेल मी शिवसेना,” कपिल सिब्बल यांनी आज कोर्ट गाजवलं
- हेही वाचा…जुन्या निवृत्तीवेतनासह अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप, फडणवीसांनी मांडली आपली भूमिका, घेतला ‘हा’ निर्णय
- हेही वाचा.“शीतल म्हात्रे बहिणीसमान, मला आणि माझ्या कुटुंबीयाला प्रचंड मानसिक त्रास झाला,” सुर्वेंची प्रतिक्रिया
- हेही वाचा..“राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवणं हे सरकार पाडण्याचं पाऊल होतं”, 4 पैकी एकच मुद्दा योग्य, न्यायाधीशांची मोठी टिप्पणी
- हेही वाचा…सभागृहात मंत्र्यांची अनुपस्थिती, अजित पवार संतापले, फडणवीसांनी दिलं उत्तर, सभागृहात एकच शांतता