मुंबई : काही महिन्यांपूर्वी अंबानींच्या ‘अँटिलीया’ इमारतीबाहेर जिलेटीनच्या स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली आणि त्यानंतर घडलेल्या घटनांनी राज्याचे राजकारण अक्षरशः पूर्णपणे ढवळून गेले. दरम्यान, त्या सगळ्या घटना क्रमांनंतर शुक्रवारी NIA ने न्यायालयात या घटनेतील आरोपींविरोधात १० हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यात प्रसिद्धिसाठीच वाझेने स्फोटक प्रकरणाचा कट रचला, उत्तम तपास अधिकारी म्हणून पुन्हा नावलौकिक प्राप्त होईल, अशी आशा वाझेला होती, असा खुलासा केला.
…म्हणून वाझेने ‘अँटिलीया’बाहेर पार्क केली स्फोटकांची गाडी, NIA ने केले आरोपपत्र दाखल
त्यांनतर आता मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी एक नवा खुलासा झाला असून, NIA दाखल केलेल्या आरोपपत्रात असं म्हटलं गेलं आहे की, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्याकडे मनसुख हिरेन यांना मारण्याचं काम देण्यात आलं होतं. त्यासाठी त्यांना सचिन वाझेकडून ‘मोठी रक्कम’ देखील देण्यात आली होती. प्रदीप शर्मा यांनीच संतोष शेलार यांच्यासाथीने ही हत्या घडवून आणली होती, असं हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार आरोपपत्रात म्हटलं आहे.
समन्सनंतर आता ईडीकडून देशमुखांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी
तसेच, मनसुख हिरेनच्या हत्येआधी म्हणेजच २ मार्चला वाझेने हिरेनसोबत एक बैठक केली होती. त्यात त्याच्यासोबत सुनील माने आणि प्रदीप शर्मा उपस्थित होते. हिरेनची ओळख पटावी म्हणून वाझेने या दोघांनाही सोबत नेलं होतं. अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतरच्या एका आठवड्यात ही बैठक झाली होती. दरम्यान, रक्कम मिळाल्यानंतर शर्मांनी शेलारांना फोन केला, लाल तवेरा गाडीचा तपशील मिळवला. ज्याचा वापर हिरेन यांची हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी केला जाणार होता.
परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या, भ्रष्टाचारप्रकरणी जामीनपात्र वॉरंट जारी
त्यांनतर वाझे आणि मानेंनी ठरवल्याप्रमाणे ४ मार्चला क्रिकेट बुकी नरेश गोटकडून मिळालेल्या बनावट सिमने, हिरेन यांना मालाड पोलीस म्हणून कॉल केला होता. मग हिरेन ठाण्यातील घोडबंदर रोडवरील सुरज वॉटर पार्कजवळ पोलीस अधिकाऱ्याला भेटला. तिथे मानेने हिरेनला सोबत घेतले आणि शेलारपकडे पोहोचवले. जिथे आधीपासून काही लोकं वाट पाहत होते. यानंतर त्यांनी कारमध्ये हिरेनची हत्या केली आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला,” असं आरोपपत्रात म्हटलं आहे.
Read Also :
- विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली; देवेंद्र फडणवीसांवर पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी
- पेडणेकर, जाधव, कांबळे, धोत्रे, पाटील हे मराठी नाहीयेत का?; गोपीचंद पडळकरांचा सवाल
- सुनेच्या गंभीर आरोपानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
- भाजप खासदाराच्या सुनेचे कुटुंबियांवर गंभीर आरोप, राष्ट्रवादीकडे केली मदतीची मागणी
- राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागणार का? विजय वडेट्टीवारांचं दिलं स्पष्टीकरण