अकोला : एकाचे मुंबई तर दुसऱ्याचे बारामतीवर लक्ष आहे. उर्वरित राज्य वाऱ्यावर सोडण्यात आले आहे, अशी जोरदार टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे.
महाराष्ट्रातील कोरोनारुग्ण संख्या गेल्या काही दिवसात प्रचंड वाढली आहे. संसर्गची साखळी तोडण्यासाठी सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर देखील मोठा ताण पडला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत उपाचारासाठी उभी केलेली यंत्रणा बळकट करण्याऐवजी ती मोडून टाकण्यात आली. त्यामुळे दुसरी लाट आली तेव्हा उपचाराविना माणसं मेली, असे म्हणत कोरोनाचे संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असल्याचे ते म्हणाले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात आपातकालीन व्यवस्थापनावर राज्य शासनाला आलेल्या अपयशाबाबत व तिसरी लाट थोपविण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांबाबत मुख्यमंत्र्यांचे मुंबई तर उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीवरच लक्ष आहे. उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर असल्याचा आरोप त्यांनी केला. अकोला येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीका केली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काम नाही केलं तरी चालेल, पण राज्यातील आपात्कालीन समित्या बळकट करा. त्यामुळे नागरिकांना वेळेवर उपाचाराबाबत व आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत योग्य सल्ला या समित्या देवून मदत करू शकतील, असेही ते म्हणाले.
Read Also :
- काँग्रेसची आग्रही मागणी, तातडीने नुकसानीचे पंचनामे करा
- लवकरच आणखीन एक वादळ? गृहमंत्र्यांची परवानगी न घेता राज्याचे महासंचालक चंदीगडला!
- ‘घरी राहून काम खूप झाले, आता मंत्रालयातून काम कधी करणार?’
- “आता काहीही बोलण्यासारखं राहिलं नाहीये” म्हणत, केंद्रीय समितीतील वैद्याने दिला राजीनामा
- आंदोलन थांबलं नाही! थांबणार नाही! मराठा आंदोलनात भाजप होणार सहभागी