राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. आता लॉकडाऊनला वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी विरोध केला आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांना राज्यातील लॉकडाऊन हटविण्याचे आवाहन केले आहे.
अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी लॉकडाउन हटविणे राज्यासाठी हितावह असल्याचे, आंबेडकर म्हणाले.
ते म्हणाले की, ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे,भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही. ते कोरोनाने नाही तर रोजगार बुडाल्याने मरतील, अशी भिती देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या कामाला लागावे. तरच माणसं जगतील अन्यथा उपासमारीने मरतील अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन राज्यात वाढवू नका, असे आंबेडकर म्हणाले.