अयोध्येतील शेकडो वर्ष जुन्या राममंदिर-बाबरी मशिदी प्रकरणाचा निकाल हा तथ्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
अयोध्या ही बौद्धांचे ज्ञानाचे केंद्र होते. प्रयागराज उच्च न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा हा निकाल तथ्यांवर नाही तर भावनांवर म्हणजे राम मंदिराच्या बाजूने लागल्याचे आंबेडकर म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयातही इतिहास आणि पुराव्यांना ग्राहय धरले. अयोध्या ही पूर्वी साकेत नावाने ओळखली जात होती. या ठिकाणी केलेल्या खोदकामात जे सापडले ते बौद्ध अवशेष आहे हे अलाहाबाद न्यायालयाने हे मान्य करायला हवे होते. मात्र तसे घडले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
आंबेडकर म्हणाले की, सद्य परिस्थिती पाहता राम मंदिर निर्माण करण्याची गरज असून आम्ही राम मंदिराच्या बाजूने निकाल देतो, असे स्पष्ट न्यायालयाने सांगायला हवे होते. असे झाले असते तर भारतीयांकडे कोणी संशयित नजरेने पाहिले नसते.