राज्यात कोरोनाच्या काळातही राजकीय जुगलबंदी जोरदार सुरु असताना दिसत आहे. महविकासाआघाडी विरुद्ध भाजप असा आरोप प्रत्यारोपाचा सामना सध्या चालू आहे या सामन्यात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील याना जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी या दोन नेत्यांना विपश्यना करण्याचा सल्ला दिला आहे.
“सत्तेसाठी कासावीस झालेल्या भाजपाच्या चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे विरोधीपक्ष म्हणून प्रतीक्षा करावी आणि ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जावून विपश्यना करावी,” असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाच्या दोन प्रमुख नेत्यांना दिला आहे.
सत्तेसाठी कासावीस झालेल्या भाजपच्या चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे विरोधीपक्ष म्हणून प्रतीक्षा करावी आणि ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जावून विपश्यना करावी !
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 27, 2020