अहमदनगर : राज्यात एसटी विलगीकरणाचा मुद्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. सत्ताधारी पक्षांतील अनेक नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या सगळ्या भेटीगाठी निष्फळ ठरल्या आहेत. अशातच आता भाजपनेते गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी या अंदोलनात पुन्हा एकदा उडी घेतली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन आणखी चिघण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा मोर्चो ! फडणवींसासह अनेक भाजप नेते आझाद मैदानावर
राज्यात सुरू असलेल्या एसटी संपाला पाठिंबा देणारा वंचित बहुजन आघाडी हा पहिलाच राजकीय पक्ष आहे. आम्ही तुम्हाला हे आंदोलन याल तेवढं न खेचण्याचा सल्लाही दिला होता. महाविकास आघाडी उपटसुंभ कामगार नेत्यांच्या मागे लागल्यानं आज एसटी कामगारांची फसगत झाली. एसटी महामंडळाचा निरोप दोन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला. उद्धव ठाकरेे हे केवळ नावाला मुख्यमंत्री आहेत. कर्तृत्वाने नाही, अशा शेलक्या शब्दात त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे.
गिरीश महाजन यांना उच्च न्यायालयाने फटकारलं ! 10 लाख रूपये देखील जप्त करण्याचे दिले आदेश
प्रकाश आंबेडकर यांनी एसटी महामंडळाला सातवा वेतन आयोग द्यावा, अशी मागणी देखील केली आहे. तसेच चोर, लुटारूचे सरकार आहे. जे कर्मचारी कामवर रूजू झाले त्यांच्याकडून वसुली करत आहेत. जितके दिवस कामावर गेला नाही त्याची नुकसान भरपाई ही एसची कर्मचाऱ्यांकडून घेतली जात आहे. त्यामुळे पगार कपात होत असल्याने एसटी कर्मचारी कामावर जाऊ की नको या विवेंचनात सापडला आहे. खरं तर या सरकारला एसटी महामंडळ मोडीत काढायचं आहे. त्यातून त्यांना खासगी बस सुरू करून त्यातून पैसा कमावयाचा आहे. याचसाठी सत्ताधारी नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
व्हिडीओ क्लिपमध्ये ते मोठे साहेब कोण? शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलगीकरणाच्या मागण्यासाठी संप पुकारला आहे. परंतु त्यावर अजून कोणताही तोडगा निघाला नाही. अशातच आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा 10 मार्चपर्यंत कामावर येण्याचं आवाहन केलं आहे.
Read also:
- नाटकातील सरपंच, मंजुळाबाई, गोप्या, मास्तर कोण? अंक अजून बाकी! शेलारांचा सरकारला इशारा
- महाविकास आघाडी सरकारवर शरद पवार नागासारखे बसलेत! नितेश राणेंची जहरी टीका
- राज्यभर आम्ही लढा उभारू अन् तुमचं जगणं मुश्किल करून टाकू! चंद्रकांत पाटलांचा इशारा
- अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भाजप माहीर! फडणवीसांच्या राजकीय बॉम्बवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
- नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शातं बसणार नाहीत! फडणवीसांचा हल्लाबोल