अकोला : निवडणूक आली की, काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय आघाडीची मोठी चर्चा सुरू होते. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चर्चेनंतरही ही आघाडी होऊ शकली नाही. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेत ४२ लाख आणि विधानसभेत २७ लाखांवर मतं घेत काँग्रेस आघाडीचे मोठं नुकसान केलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर आज काँग्रेसनं आंबेडकरांशी भविष्यात जुळवून घेण्याची संकेत दिलेत. प्रकाश आंबेडकरांशी आघाडीच्या दृष्टीने चर्चा करणार मोठं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलं आहे. ते आज अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
सध्या नाना पटोले काँग्रेसच्या संघटनात्मक कामांचा आढावा घेण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांशी भविष्यातील आघाडीच्या मुद्द्यावर संकेत दिलेत. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आंबेडकरांशी चर्चा करणार असल्याचं पटोले म्हणालेत. काही छोट्या पक्षांशीही आघाडीसंदर्भात चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, सध्या आंबेडकरांशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, अकोल्यातही नाना पटोले यांनी आज पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. शरद पवार यांनी २०२४ मध्ये ‘महाविकास आघाडी’ एकत्रित निवडणूक लढणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरही नाना पटोले यांनी शरद पवारांचा ‘एकी’चा दावा खोडून काढला. शरद पवार काय म्हणालेत हे आपल्याला ठावूक नाही. मात्र, आपल्या काँग्रेस पक्षाची भूमिका आपणच जाहीर करणार असल्याचं पटोले यांनी निक्षून सांगितलं. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष राज्यात स्वबळावरच लढणार असल्याचं ते म्हणालेत. यासोबतच २०२४ मध्ये काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याचं भाकीत केलं आहे.
Read Also :
- ‘बाळासाहेब आज असते, तर त्यांनीच विमानतळाला नाव नाकारले असते!’ – छगन भुजबळ
- ‘शिवसेना हा “वचन पाळणारा मित्र” म्हणणे म्हणजे…’ राम कदम यांची जोरदार टीका
- ‘पिंजऱ्यातल्या वाघालाही मिश्या असतात, हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा’
- मराठा क्रांती मुक मोर्चा ही वादळापुर्वीची शांतता – संभाजीराजे
- अजित पवारांनी दिला पुणेकरांना दिलासा! निर्बंधांबाबत केली मोठी घोषणा