भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रेडियो वर ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला . विशेष म्हणजे आज (26 जुलै) कारगील विजय दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी’कार्यक्रमात कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली.पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सैनिकांच्या शौर्याचा विजय झाला.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, “तो दिवस सर्वात मौल्यवान क्षणांपैकी एक आहे. सोशल मीडियावर लोक आपल्या वीरांना सलामही करीत आहेत. सर्व देशवासीयांच्या वतीने मी अशा वीरांना जन्म देणाऱ्या त्या धाडसी मातांना नमन करतो.कारगिल युद्धाच्या वेळी वाजपेयीजींनी लाल किल्ल्यावरुन गांधीजींच्या मंत्रांची आठवण करून दिली होती. जर एखादा अडचणीत असेल तर त्याने भारतातील असहाय्य गरी व्यक्तीविषयी विचार करायला हवा. कारगिलने आम्हाला दुसरा मंत्र दिला आहे. आपण असा विचार केला पाहिजे की आपले हे पाऊल दुर्गम डोंगरांमध्ये आपला प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकास अनुकूल आहे.
आपण करीत असलेल्या विचारसरणीचा सीमेवरील सैनिकांच्या मनावर खोल परिणाम होतो. आपण असे राहायला पाहिजे की, ज्यामुळे सैनिकांचे मनोबल वाढेल. कधी-कधी आपण सोशल मीडियावर अशा गोष्टी फॉरवर्ड करतो, ज्यामुळे देशाचे मनोबल कमी होते. आजकाल केवळ मैदानातच युद्ध लढले जात नाही.