बीड : महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांत केलेल्या कामाला एकदाही यश आलेले नाही. त्यांच्या प्रत्येक कामांच्या अपयशासाठी राज्य सरकारने नेहमी केंद्राकडे बोट दाखवले आहे. त्यापेक्षा मग, महाराष्ट्र सरकार केंद्रशासित करा आणि केंद्र सरकारला चालवायला द्या, असा टोला भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष खासदार प्रितम मुंडे यांनी लगावला.
एसटी संपाबाबत शरद पवार चांगला निर्णय घेतील; खासदार नवनीत राणांचा विश्वास
ओबीसींचे राजकीय आरक्षणसुद्धा राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे. केंद्र सरकार इम्पेरिकल डेटा देत नसल्याचा आरोप सतत राज्याने केला. राज्य सरकारकडे आमदार, मंत्र्यांसाठी पैसा आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी नाही. सरकारमधील मंत्री लोकांच्या प्रश्नांऐवजी फक्त टिका-टिप्पण्णी करण्यासाठी माध्यमांसमोर येतात, अशी टीका मुंडे यांनी केली आहे.
अमरावती हिंसाचार प्रकरणी अटक सत्र सुरूच; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखासह ४ जणांना अटक
राज्य सरकारने आयेागामार्फत डाटा गोळा करावा, यासाठी आयोगाला निधी उपलब्ध करुन द्यावा. राज्याच्या वेळकाढूपणामुळेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाली. आरक्षण घालवण्याचे पाप या सरकारने केला आहे. आता सामान्य लोकांनीच सरकारला जागा दाखवावी, असा संतापही प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला.
Read Also :
- पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे, चंद्रकांत पाटलांना त्याचेच झटके येत असतील – संजय राऊत
- अनिल परबांच्या घराबाहेर जनशक्तीच्या कार्यकर्त्यांचा राडा; शाई फेकण्याचा प्रयत्न
- शरद पवार कधीच तोडगा काढत नाहीत, नुस्त खेळवत ठेवतात; नारायण राणेंचा घणाघात
- पुण्यात मनसेला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता पक्ष सोडण्याची चर्चा ?
- ‘ओह माय गॉड! क्रांती जी’ म्हणत मलिकांनी क्रांती रेडेकरांचे चॅट केले व्हायरल; चॅटमध्ये होते ‘हे’ गुपित