काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियाचे कंत्राट भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला दिल्याचा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण पत्रकार परिषदेत बोलत होते.
सोशल मीडियाचा कंत्राट दिलेला पदाधिकारी भाजपचा आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. याप्रकरणी भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी
महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांनी 2019 सालाच्या निवडणुकीवेळी कुणाच्या दबावाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या कंपनीला कंत्राट दिलं? त्यांच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही राजकीय दबाव होता का? त्यावेळी निवडणूक आयुक्त कोण होते? त्यांना कोणी नेमले होते? या सर्व गोष्टींची सखोल चौकशी व्हायला हवी. भारतीय संविधानानुसार ज्या संस्था उभ्या आहेत त्यांचा गैरवापर भाजपने केला”, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.