केंद्रातील भाजपा सरकारने, जनतेने निवडून दिलेले सरकारं पाडण्याचा प्रयत्न करत आपली इच्छा स्पष्ट केली आहे. जनता याचे उत्तर नक्की दिईल. अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली आहे.
राजस्थानात सध्या राजकीय संकट निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री गेहलोतांची खुर्ची धोक्यात असल्याचे दिसत आहे. अशी स्थिती असतानाच, राजभवन आणि राज्य सरकार याच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपावरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते, या राजकीय संकटासाठी भाजपा जबाबदार धरत आहेत. यातच आता काँग्रेस सरचिटनीस प्रियंका गांधी वाड्रा यांनीही भाजपा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रियंका यांनी सोशल मीडियाच्या माध्यमाने भाडपावर हल्ला केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, की राजस्थानातील संकट पाहता, भाजपाची इच्छा स्पष्ट आहे. ते निवडून आलेले सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रियंका म्हणाल्या सध्या देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. सध्या देशाला जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. मात्र, केंद्रातील भाजपा सरकारने, जनतेने निवडून दिलेले सरकारं पाडण्याचा प्रयत्न करत आपली इच्छा स्पष्ट केली आहे. जनता याचे उत्तर नक्की दिईल.