दिल्ली : “पेगासस प्रकरणाचे सत्य काल संसदेत सर्वांसमोर आल्याने, आता या देशात कोणीही सुरक्षित नसल्याचं स्पष्ट झालं आहे. हा देशद्रोह आहे, देशाशी आणि देशाच्या जनतेशी केलेला धोका आहे, विश्वासघात आहे. आपल्यावर कुणीतरी पाळत ठेऊन आहे, अशी भीतीची भावना आता प्रत्येक देशवासियांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे, आम्ही या मुद्द्यावर संसंदेत आवाज उठवणारचं! हिंमत असेल तर सरकारने या मुद्द्यावर आमच्याशी चर्चा करावी,” असं आव्हानच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे.
का होतोय केंद्रावर नागरिकांची हेरगिरीचा केल्याचा आरोप? काय आहे नेमकं ‘पेगासेस’ प्रकरण; वाचा थोडक्यात
दरम्यान, काल या प्रकरणावरून संसदेत गदारोळ झाल्यानंतर, आता या प्रकरणावरून सर्वच विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. “काँग्रेस नेते राहुल गांधींपासून महत्त्वाचे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, न्यायाधीश आणि निवडणूक आयोगाचे माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा अशा अनेक लोकांवर सरकार पाळत ठेऊन आहे,” असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
मोदींनी मन जिंकले : भर पावसात स्वतःच छत्री घेऊन संसदेत पोहोचले
तसेच, “स्वतःच्याच मंत्री मंडळातल्या, रेल्वे राज्यमंत्री अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद पटेल यांचीही हेरगिरी केली गेली. हे का केलं गेलं? देशाला हे समजलं पाहिजे, हा अत्यंत गंभीर आहे,” असं म्हणत त्यांनी, “महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार तयार होत असतानाही आमचे फोन टॅप करण्यात आले. मुख्यमंत्र्यांसपासून अनेक सर्वपक्षीय नेत्यांचे फोन टॅप केले गेले. मात्र, असल्या गोष्टींना न घाबरता आम्ही सरकार स्थापन केलं,” असं त्यांनी म्हटलं.
“काँग्रेसनेही कायम केला आहे यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर”, भाजपने आकडेवारी देत केला गंभीर आरोप
या प्रकरणाच्या उलघड्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. हे संपूर्ण प्रकरण देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेशी संबधित आहे. आता देशातील नागरिकांना त्यांच्या घरात देखील असुरक्षित वाटू लागलं आहे. त्यामुळे याबद्दलचं सत्य पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी देशाच्या समोर येऊन सांगावं. या संकटाशी आम्ही सर्व विरोधी पक्ष मिळून लढणार आहोत. आम्ही आंदोलन करणार आहोत,” असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केले देवेंद्र फडणवीसांना नव्या पुण्याचे शिल्पकार
भारतासह जगभरातील ४० देशांची सरकारांनी, राष्ट्रीय सुरक्षेशी काहीही संबंध नसतानाही हेरगिरीच्या साधनांचा वापर केला असल्याचे, ‘द वायर’ या वेबाईटसह आणि अन्य १६ माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारितेतून समोर आले आहे. यात इस्रायलच्या एनएसओ ग्रुपच्या ‘पेगॅसस’ या हॅकिंग सॉफ्टवेअर द्वारे भारतातील पत्रकार, नेते, न्यायाधीश आणि उद्योगपतींचे फोन हॅक केल्याचं वृत्त, गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय माध्यमांत सुरु आहे.
Read Also :
- पंकजांना डावलून प्रदेश भाजपची जोरदार बैठक; प्रश्नांची झोड उठताचं प्रवक्त्यांकडून पांघरण घालण्याचा प्रयत्न
- आषाढीदिनी पंतप्रधान मोदींची विठ्ठल चरणी प्रार्थना; म्हणाले वारकरी चळवळ ही…
- राज्यसभेच्या १४ जागा रिक्त, पोटनिवडणूक एकाच जागेवर, राजकीय पक्षांना धक्का
- रणधुमाळी महापालिका निवडणुकांची : पुण्याची काँग्रेसची धूरा पृथ्वीराज चव्हाणांकडे?
- अन् मला ती वारी पुन्हा पाहायची आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे