नाशिक : राहुल गांधींना जाहीरपणे सांगतो की सावरकर आमचे दैवत असून त्यांचा अपमान आम्हाला पटणार नाही. सावरकर काय होते हे आपण वाचू शकतो. अष्टभुजेसमोर शपथ घेणारे सावरकर होते. १५ व्या वर्षी ही सावरकरांची शपथ होती. सावरकरांनी जे केले ते कोणाचेही काम नाही. १४ वर्ष छळ सोसला ते बलिदानच आहे. म्हणून राहुल गांधींना सांगतोय आपण लोकशाही वाचवायला आलोय. आता जर वेळ चुकली तर मग पुढे कठीण आहे. पुन्हा जर हे तिथे बसले की मग लोकशाही संपली. ही लढाई मी मुख्यमंत्री होण्याची नाही. लोकशाही वाचवण्याची आहे. असं उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत जाहीरपणे सांगितले आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन..!, राष्ट्रवादी पुन्हा, वारे परिवर्तनाचे, ध्यास प्रगतीचा अभियान सुरू”
पुढे बोलतांना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टिका केली आहे. तुम्ही मोदींच्या नावाने निवडणुका लढवा. मी माझ्या वडिलांच्या नावाने लढतो, पण निवडणुका घ्यायच हिंमत दाखवा. असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. तसेच मला सत्ता गेल्याचे दुख नाही पण चांगले काम करणारे सरकारी गद्दारी करून पाडले. खंडोजी खोपड्यांची औलाद असा उल्लेख देखील त्यांनी केला.
हेही वाचा…“राज्यात बाळासाहेबांच्या खुप सभा व्हायच्या, परतुं…” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
मुख्यमंत्री स्वत: च्या शेतात रमतात पण आमच्या शेतकऱ्यांच्या बांधावर येण्यासाठी त्यांना वेळ नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यावर जाऊन विचारपुस केली का ? असा सवालही देखील उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. अवकाळी पावसामुले द्राक्ष आणि कांदा पिकाला फटका बसला तरीही आमचे देशाचे कृषीमंत्री म्हणतात, विशेष काही नाही झालं. असंही त्यांनी म्हटलं.
Read also
- हेही वाचा…“भाजप म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष, काही चांंगली माणसं कशी सहन करतात “, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
- हेही वाचा…“राष्ट्रवादीची बॅनरबाजी ही एकप्रकारची मुर्खता”, बच्चू कडूंची जहरी टिका
- हेही वाचा…“तर अजित पवार यांनी माझ्या कामठी मतदारसंघात निवडणुक लढायला यावं”, बावनकुळेंचं आवाहन
- हेही वाचा…“शरद पवारांनी 2024 मध्ये एनडीएमध्ये यावं, ” केंद्रीय मंत्र्यांची शरद पवारांना खुली ऑफर
- हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना बोलण्यापुर्वी ज्या बेईमानांना मांडीवर घेऊन बसलेले आहात, त्या जनाबांना आधी सांभाळा”