पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्यांना कडक निर्बंधासह लॉकडाऊनपासून तूर्तास दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे. पुणे शहरातील दैनंदिन जीवनसुद्धा आता पूर्वपदावर येत असून, महामारीची परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे.
या पार्श्वभूमीवर, आज पुण्याचे पालकमंत्री तथा संपर्कमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणेकरांसाठी एक मोठी घोषणा केली असून, शहरातील निर्बंधांमध्ये आणखीन शिथिलता देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
सध्या पुण्याचा बाधित होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५% आणि त्याच्या खाली आहे, यामुळे हे निर्बंध कमी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. त्यानुसार आता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार पुण्यात सोमवारपासून मोठी शिथिलता मिळणार आहे.
काय आहेत पुणेकरांसाठी नवे निर्बंध…
- पुणे मनपा हद्दीत सोमवारपासून अभ्यासिका आणि वाचनालये मर्यादेच्या ५०% क्षमतेने उघडण्याला परवानगी.
- व्यायामशाळा, सलून-ब्यूटी पार्लर-स्पा ५०% क्षमतेने, पूर्व नियोजित वेळेनुसार (आठवड्यातील सर्व दिवस) उघडण्याला परवानगी. (A.C सुविधा वापरता येणार नाही)
- आठवड्यातील सर्व दिवस मद्य विक्रीची दुकाने सुरु.
- कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु करण्यास परवानगी.
- मॉल ५०% क्षमतेने उघडण्यास परवानगी.
- सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णतः बंदच राहतील.
- आस्थापनांना सं. ७ वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार.
- अत्यावश्यक दुकानांच्या व्यतिरिक्त इतर दुकाने सोम.- शुक्र. सुरु. (शनिवार-रविवार पूर्णतः बंद)
- पुणे मनपा क्षेत्रातील बांधकामे नियमितपणे सुरु राहतील.
- ई-कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याला परवानगी.
- अंत्यसंस्कार, दशक्रिया व संबंधित विधी जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी.
- विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था आणि सहकारी संस्थांच्या महत्वाच्या सभा ५० % उपस्थितीत घेण्यास परवानगी.
- रेस्टॉरंट, बार, फुडकोर्ट रा. १० पर्यंत क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील.
- पार्सल सेवा किंवा घरपोच सेवा रा.११ पर्यंत सुरु राहतील.
- आठवड्यातील सर्व दिवस स. ५ ते ९ व दु. ४ ते सं. ७ वाजेपर्यंत शहरातील सर्व उद्याने, खुली मैदाने, चालणे व सायकलिंग सुरू राहील.
Read Also :
- ‘अजूनही वेळ गेली नाही, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा उद्धव ठाकरेंनी विचार करावा!’
- “लोकांचे बाप काढणाऱ्या महापौरांनी शहाणपण शिकवू नये” – संदीप देशपांडे
- ‘त्यांचं माहिती नाही पण आम्ही मात्र निवडणूका स्वतंत्रपणे लढवणार’ – नाना पटोले
- ‘बाळासाहेब आज असते, तर त्यांनीच विमानतळाला नाव नाकारले असते!’ – छगन भुजबळ
- ‘शिवसेना हा “वचन पाळणारा मित्र” म्हणणे म्हणजे…’ राम कदम यांची जोरदार टीका