पुणे : पुणे महानगर नियोजन समितीची पहिली बैठक आज (२६ जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या समितीच्या बैठकीत समाविष्ट २३ गावांसह पीएमआरडीएच्या हद्दीचा प्रारूप विकास आराखड्यास मान्यता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा: आढावा बैठकीनंतर पूरग्रस्त भागासाठी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय
पीएमआरडीएच्या (PMRDA) हद्दीतून वगळून २३ गावांचा समावेश महापालिकेच्या हद्दीत करणे, त्या पाठोपाठ या गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून पीएमआरडीएची नियुक्ती करणे आणि त्यानंतर पुणे महानगर नियोजन समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. असे असताना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीची पहिली बैठक सोमवारी आयोजित केली आहे. महापालिकेच्या हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्यापूर्वीच पीएमआरडीएने हद्दीचा विकास आराखडा तयार केला आहे. मात्र या आराखड्यास पुणे महानगर नियोजन समितीची मान्यता आवश्यकता आहे.
हे पण वाचा: एकदा शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या, पुन्हा कधीच भीक मागणार नाही! जगण्यासाठी त्यांनी जोडले हात
मात्र, समितीच अस्तित्वात नसल्यामुळे विकास आराखड्याचे काम थांबले होते. परंतु राज्य सरकारने गावे समाविष्ट करण्यापासून ते पुणे महानगर नियोजन समिती स्थापन करण्याचे एकापाठोपाठ निर्णय घेऊन महापालिकेतील सत्ताधारी भाजपला दणके दिले. असे असताना समिती स्थापन होऊन चार दिवस होत नाहीत, तोच पहिली बैठक सोमवारी होत असल्याने महाविकास आघाडीने भाजपला तिसरा दणका देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्राबरोबरच या गावातील नागरिकांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
Read Also :
- दादा, तुम्हीच आमचे वाली; चिपळूणच्या व्यापाऱ्यांची नारायण राणेंना आर्त हाक
- हर्षवर्धन पाटलांचा कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम’? भरणेंचा मोठा गौप्यस्फोट
- परळीत पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त मुंडे समर्थकांची बॅनरबाजी, मात्र भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब
- आढावा बैठकीनंतर पूरग्रस्त भागासाठी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय
- एकदा शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या, पुन्हा कधीच भीक मागणार नाही! जगण्यासाठी त्यांनी जोडले हात