पुणे- महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाची जी राजकीय कोंडी होत आहे ती आता अखेर नाना पाटोले यांनी बोलून दाखवली. गोंदिया जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती सभापतीच्या निवडणुकीत पटोले विरूद्ध पटेल असा राजकीय संघर्ष बघायला मिळाला. त्यामुळे मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काॅंग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहे. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असं ट्विट करत नाना पटोले यांनी राष्ट्रवादी विरोधात आवाज उठवला.
“तर देशात भाजप विरोधात चळवळी उभ्या कराव्या लागतील”; शरद पवारांनी दिला ‘हा’ इशारा
मात्र या प्रश्नाचे उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र सारवासारव केल्याचे पाहायला मिळत आहे. “भंडाऱ्यात मतभेद झाले असतील ते काँग्रेसचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत चर्चा करून सोडवू असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
“सतत न्यायालयाची बोलणी खाणाऱ्या निरुपयोगी सरकारला जनता माफ करणार नाही”; चंद्रकांत पाटील
“भंडारा-गोंदिया राष्ट्रवादीने भाजपशी युती करून काँग्रेसच्या पाटील सुरा खुपसला”, असे नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्यावर विचारले असता या प्रकरणी काँग्रेस आणि नाना पटोले यांच्याशी चर्चा करू असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. तसेच “आघाडी आहे भांड्याला भांडे लागतेच जे कुटुंब प्रेम आदित्य भांड्याला भांडे लागते घरातही सर्वजण राहत असतात त्यांच्यातही भांडणे होत असतात त्यामुळे सगळेच तर एकमेकांना हो म्हणायला लागले तर त्याला दडपशाही म्हणतात. ती आमच्याकडे नाही” हेही सांगायला त्या विसरल्या नाहीत.
न्यायालयाच्या निकालामुळे मध्यप्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण घालवले, अशी कबुली भाजप देणार का?
दरम्यान, भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वाघमारे यांच्या बंडखोर गटाचे 5 आणि 1 अपक्ष अशा सदस्यांनी सर्वाधिक 21 सदस्य असलेल्या काॅंग्रेसला पाठिंबा दिला. त्यांना बसपा 1, शिवसेना 1 वंचित 1 आणि अपक्ष 2 अशा सदस्यांचा पाठिंबा मिळला. तर भाजपमधील आमदार परिणय फुके आणि खासदार सुनिल मेंढे यांच्या 7 सदस्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला साथ दिली. राष्ट्रवादीचे सदस्य 13 असून भाजप आणि राष्ट्रवादी विरोधी बकावर बसले.भंडाऱ्यात राजकीय खेळीचे पडसाद गोंदियात उमटले. त्याठिकाणी काॅंग्रेसला सुरूंग लावण्याचा प्रयत्न भाजप आणि राष्ट्रवादीने केला होता. परंतु भाजपने राष्ट्रवादीशी युती करत जिल्हा परिषदेत सत्ता हस्तगत करून काॅंग्रेसची कोंडी केली. त्यामुळे नाना पटोले राष्ट्रवादी काॅंग्रेसवर नाराज असल्याचं बोलण्यात येत आहे.
Read also:
- तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात संभाजी राजेंना प्रवेश नाकारला, अन्..;
- भाजप नेते गणेश नाईक म्हणाले, हे प्रकरण संपल्यानंतर मी..; बलात्कार प्रकरण त्यांना भोवलं
- ” केंद्र सरकारने वेळीच धडा घेतला नाही तर महागाईचा भस्मासूर उग्र रूप धारण करेल”
- “माणसं जमा करायला शिवसेनेला राज ठाकरेंचा आधार घ्यावा लागतो का?”; शिवसेनेच्या टिझरमध्ये राज यांच्या सभेतील दृश्य
- राजद्रोहाच्या कलमामुळे कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे; छगन भुजबळ