आर्णी: भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा उधान आले आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेऊन राजू तोडसाम यांच्या प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचं कळतंय. पुढील काही दिवसांत आर्णी मतदारसंघात सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय होऊ शकतो असं बोललं जात आहे. राजू तोडसाम यांच्या रुपानं जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आदिवासी नेतृत्वाची पोकळी भरली जाणार असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरु आहे.
हे पण वाचा: “हुकूमशाही सरकारकडून संविधानाचा अवमान”, राष्ट्रवादीचा हल्लाबोल; दिली आंदोलनाची हाक
भाजपमध्ये अशताना राजू तोडसाम वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत तोडसाम यांचं तिकीट भाजपनं कापलं. त्यांच्याऐवजी भाजपनं डॉ. संदीप धुर्वे यांना मैदानात उतरवलं होतं. तोडसाम यांनी त्यावेळी बंडखोरी करत तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती. त्यामुळे तोडसाम यांच्या रुपाने राखीव मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा डोळा असल्याचं चर्चा सध्या सुरु आहे.
हे पण वाचा: डान्सबार सुरू मात्र देवदैवत कुलुपात बंदिस्त, राज्य सरकारचा ढोंगीपणा जनतेसमोर उघड
राजू तोडसाम यांना जानेवारीमध्ये तीन महिन्यांचा कारावास ठोठावण्यात आला होता. वीज वितरण कंपनीविरोधात आंदोलन करताना त्यांनी लेखापालाला मारहण केली होती. पांढरकवडा सत्र न्यायालयानं त्यांना ही शिक्षा सुनावली होती. तोडसाम यांनी २०१३ मध्ये वीज वितरण कंपनीत आंदोलन करत लेखापालाला मारहाण आणि शिवीगाळ केली होती. त्याप्रकरणात कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तीन महिने कारावासाची कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा वरिष्ठ न्यायालयानेही कायम ठेवली होती. त्यानंतर तोडसाम यांनी रवानगी यवतमाळ जिल्हा कारागृहात करण्यात आली होती.
Read Also :
- डान्सबार सुरू मात्र देवदैवत कुलुपात बंदिस्त, राज्य सरकारचा ढोंगीपणा जनतेसमोर उघड
- मोठी बातमी! अखेर “या” कारणासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार काँग्रेस
- पुण्याचे खरे शिल्पकार कोण? बॅनरबाजीच्या लढाईत भाजप-राष्ट्रवादीने शहराला हरताळ फासले
- “विरोधकांकडून भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा कट”, पिगॅसस प्रोजेक्टवरून फडणवीसांचा गंभीर आरोप
- मोदींच्या काळात फोन टॅप झाले नाही, मनमोहन सिंगांच्या काळात झाले – फडणवीसांचा दावा