नगर : शुक्रवारी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना भाजप, काँग्रेसचेही अनेक नेते उपस्थित होते. यावेळी, मुख्यमंत्री मंचावर भाषण करण्यासाठी आले असता त्यांनी, भाजपच्या नेत्यांकडे पाहून, “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी” असं म्हटल. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात शिवसेना-भाजप युतीसंदर्भात विविध चर्चा रंगत आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले ‘भावी सहकारी’, आज फडणवीस-जयंत पाटील एकाच गाडीत!
दरम्यान, त्यांच्या वक्तव्यावर अजूनही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रया येत असून, ‘राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कुणीही कायमचा मित्रही नसतो. त्यामुळे काहीही चमत्कार होऊ शकतो,’ असं सूचक विधान भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. महाविकास आघाडीला कोणताही वैचारिक आधार नाही. फक्त सत्तेसाठी एकत्रं आलेले हे लोक आहेत. दुसरीकडे, सत्ता नसतानाही शिवसेना-भाजपने २५ वर्ष एकत्र काम केलं आहे,’ असं ते म्हणाले.
दिवाळीपूर्वीच देशमुख तुरुंगात जाणार, मग नंबर…सोमय्यांचा नवा दावा
तसेच, ‘आगामी काळात दोन्ही पक्ष एकत्र आले तर स्वागतच. पण कालचं त्यांचं मत कदाचित व्यक्तिगत मत असावं,’ असं म्हणत त्यांनी, ‘काँग्रेसमध्ये नेत्यांचं अवमूल्यन होत असून देखील त्यात काही सत्तेसाठी लाचार झालेले टिकून आहेत. त्यांना आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. पक्षाचं हित पाहण्यापेक्षा व्यक्तिगत हिताकडेच काँग्रेसच्या मंत्र्यांचे जास्त लक्ष आहे, त्यामुळे काँग्रेसने आता मुंगेरीलालचे स्वप्न पाहू नयेत,’ असा चिमटा काँग्रेसला काढला.
Read Also :