देश सध्या करोनाच्या संकटातून जात असून, लॉकडाउनमुळे अनेक आव्हान निर्माण झाली आहेत. तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोपांची मालिकाही सुरूच आहे. करोना आणि लॉकडाउनच्या काळात मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्यानं टीका करत आहे. राहुल गांधी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे
भाजपनं खोटेपणाचाही संस्थात्मक पातळीवर प्रसार केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. तसेच भाजपचा हा भ्रम लवकरच तुटेल आणि त्याची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल, असं ते म्हणाले. राहुल गांधी यांनी याविषयी एक ट्विट करत भाजपवर टीका केली. यात त्यांनी भाजपवर तीन प्रमुख आरोप केले. यात कोविड, जीडीपी आणि चीनच्या मुद्द्यावर मोदी सरकार खोटं बोलल्याचा आरोप केला.
राहुल गांधी म्हणाले, “भाजप खोटेपणाचाही संस्थात्मक पातळीवर प्रसार करत आहे. भाजपने कोरोना चाचणी करण्यावर निर्बंध लावले आणि कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी चुकीची सांगितली. जीडीपी मोजण्यासाठी नव्या पद्धतीचा उपयोग करण्यात आला. चिनी आक्रमणावर पांघरुन घालण्यासाठी माध्यमांना भीती दाखवण्यात आली. भाजपचा हा भ्रम लवकरच तुटेल आणि देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल.”
भाजपा झूठ को संस्थागत तौर पर फैला रही है।
1. Covid19 टेस्ट पर बाधाएँ लगायीं और मृतकों की संख्या ग़लत बतायी।
2. GDP के लिए एक नई गणना पद्धति लागू की।
3. चीनी आक्रमण पर पर्दा डालने के लिए मीडिया को डराया।ये भ्रम जल्द ही टूट जाएगा और देश को इसकी भारी क़ीमत चुकानी होगी।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 19, 2020