येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. राम मंदिराच्या बांधकामाला लवकरच सुरूवात होणार असून त्यावर वेगवेगळी मत केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राम मंदिराच्या कामाविषयी भूमिका मांडली. राम मंदिराचं भूमिपूजन धूमधडाक्यातच व्हायला हवं, पण कोरोनाचं संकट असताना ही योग्य वेळ नाही, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “यात दोन गोष्टी आहे. पहिली गोष्ट राम मंदिर झालं पाहिजे का? तर निश्चित झालं पाहिजे. ही माझी आजची नाही, माझी आधीपासूनची भूमिका आहे आणि ती मी जाहीर सभांमधून मांडली आहे. ज्यासाठी म्हणून इतके कारसेवक त्याच्यासाठी गेले. त्याच्या खोलात जायची आता आवश्यकता नाही, त्याचं जर भूमिपूजन होत असेल तर माझ्यासाठी, माझ्या पक्षासाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे ही,” असं राज म्हणाले.
राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “यात दोन गोष्टी आहे. पहिली गोष्ट राम मंदिर झालं पाहिजे का? तर निश्चित झालं पाहिजे. ही माझी आजची नाही, माझी आधीपासूनची भूमिका आहे आणि ती मी जाहीर सभांमधून मांडली आहे. ज्यासाठी म्हणून इतके कारसेवक त्याच्यासाठी गेले. त्याच्या खोलात जायची आता आवश्यकता नाही, त्याचं जर भूमिपूजन होत असेल तर माझ्यासाठी, माझ्या पक्षासाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे ही,” असं राज म्हणाले.