मुंबई : गुडीपाडव्याच्या निमित्ताने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच आज गुडीपाडव्याच्या निमित्ताने मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत ठिकठिकाणी बॅनर्स लावले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे हे केवळ खुर्च्याचे मुख्यमंत्री”, आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टिका
भोंगे बंद व्हावेत ही बाळासाहेबांची इच्छा होती. ती राज ठाकरे यांनी पुर्ण केली. त्यामुळेच ते बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत. हे आम्ही बोलत नाही लोकचं बोलतात. राज ठाकरे यांची भाषणही बाळासाहेबांसारखी असतात. देशासाठी आणि राज्यासाठी काय महत्त्वाचे आहे? हे विषय राज ठाकरे यांच्या भाषणात असतात. त्यामुळे आपल्यासह सर्वांना त्यांच्या भाषणाची उत्सुकता लागलेली असते. असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“अमृता फडणवीसांना लाच देणारे बुकी अनिल जयसिंघानी अन् त्याची मुलगी अनिक्षा, हिची समारोसमोर चौकशी होणार”
यातच सकाळी गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच बाकीचं बोलू शिवतीर्थावर असं म्हणत त्यांनी आज शिवतीर्थावर येण्याचं आवाहन केलं आहे.
Read also
- हेही वाचा…ज्यावेळी रवींद्र धंगेकर अन् हेमंत रासने आमनेसामने येतात, तेव्हा..
- हेही वाचा…“आम्ही तर वाट बघतोय की महाराष्ट्रात ‘राज’ कधी येणार ?” मनसेच्या बड्या नेत्याची पोस्टरवरून प्रतिक्रिया
- हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा, 12 हजार कोटी बजेटमधून काढले”
- हेही वाचा…“मग अमृता वहिनीच्या प्रकरणात देणाराच कसा दोषी ?” त्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचा सवाल
- हेही वाचा…““मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान”,आव्हाडांचा राज ठाकरेंच्या पोस्टरवरून टोला