मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक होत आहे. मात्र या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. ओबीसी अन्य आरक्षणाबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही सहभागी होणार आहेत. सह्याद्री विश्रामगृहावर ही बैठक होत आहे.
“…तर ईट का जवाब पत्थर से देंगे,” बावनकुळेंचा शिवसेनेला इशारा
या बैठकीसाठी राज ठाकरेंसह इतरही अनेक नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. निमंत्रितांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, राजू शेट्टी यांचाही समावेश आहे.
“राजकीय पक्षात मतभेद असतात पण…”, भाजप खासदार गिरीश बापट यांचा राणेंना घरचा आहेर
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक संस्थामधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर यातून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द केलं आहे. महाविकास आघाडी सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्याच्या कलम १२ (२)(सी) आणि राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनांनुसार आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत असेल तर ते अवैध आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या आदेशावर राज्य सरकार व इतरांनी पुनर्विचार याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व याचिकांवर सुनावणी घेऊन मूळ आदेश कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या होत्या.
Read Also :
- भाजपाची गांधीगिरी; अमृतमहोत्सवी वर्ष मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहण्यासाठी ७५ हजार पत्र पाठवणार
- भाजपमधील घुसखोरांनी माहौल बिघडवला, भाजपला शुद्धीकरणाची गरज – संजय राऊत
- एकनाथ खडसेंना मोठा धक्का: ५ कोटी ७३ लाखांची मालमत्ता ED कडून जप्त
- भाजपला समर्थन करणाऱ्या ‘राष्ट्रवादी’ची एका रात्रीत पुन्हा पलटी; ॲमेनिटी स्पेसबद्दल भूमिका बदलली
- अटक, लीलावतीनंतर योद्धा पुन्हा मैदानात; नारायण राणेंची जन आशीवार्द आज रत्नागिरीतून सुरू