देशासह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्ण सापड असल्याने समुह संसर्ग झाला आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यावर स्पष्टीकरण दिले आहे.
एक वृत्तपत्राशी बोलताना मुंबईतील समुह संक्रमणाविषयी राजेश टोपे म्हणाले की, मुंबईत करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणाच्या अहवालाबद्दल आयसीएमआरशी चर्चा करणार आहे. मुंबई शहर संक्रमणाच्या टप्प्यावर पोहोचले आहे का? याबद्दल त्यांच्याकडून माहिती घेतली जाईल.
त्यांनी सांगितले की, समूह संक्रमण आहे की नाही, हे ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआर या दोन संस्थाच महाराष्ट्र आणि देशातील समूह संक्रमणाविषयी सांगू शकतात. त्यांच्याकडे तज्ज्ञ आहेत.
झोपडपट्टी भागात संक्रमण जास्त झाल्याचं दिसून आलं आहे. पण, ते सार्वजनिक शौचालयामुळे झालं असावं. चांगल्या वसाहतींमध्ये हे संक्रमणाचं प्रमाण १५ ते १६ टक्के इतकंच आहे. अद्याप आम्ही हे म्हणू शकत नाही की, संपूर्ण शहरात किंवा राज्यात समूह संक्रमण झालेले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.