कोल्हापूर : कोरोनातून बरे झालेले काही रुग्ण म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून, त्यांचे प्रमाण वाढत असल्याची आले आहे. या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांन केली होती. मात्र, याबाबतची घोषणा होऊन देखील शासन निर्णय अद्याप झालेला नाही, यावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे.
कोरोना नंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचार जनआरोग्य योजने अंतर्गत होईल अशी घोषणा आरोग्य मंत्र्यांनी करून 4 दिवस झाले.आद्यप शासन निर्णय झालेला नाही.खासगी दवाखाने उपचारासाठी 10 लाख पॅकेजची मागणी करतात. Ambisome या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे, काळा बाजार होतो आहे, असा आरोप राजू शेट्टींनी केला आहे.
कोरोना नंतर होणाऱ्या Mucormycosis या आजारावरील उपचार जनआरोग्य योजने अंतर्गत होईल अशी घोषणा आरोग्य मंत्र्यांनी करून 4 दिवस झाले.आद्यप शासन निर्णय झालेला नाही.खासगी दवाखाने उपचारासाठी 10 लाख पॅकेजची मागणी करतात. Ambisome या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे,काळा बाजार होतोय.सर्वसामान्य
— Raju Shetti (@rajushetti) May 14, 2021
गोरगरीब आपला जीव गमावतायत. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसात 4 रुग्णांनी जीव गमावला, 5 रुग्ण अत्यावस्थ आहेत. शासन निर्णय होणार कधी? अजून किती लोकांचा बळी घेणार आहात?, असा सवाल करत राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा कोटा वाढवून द्यावा. तसेच, या इंजेक्शनची किंमत करावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केंद्राकडे केली होती.
Read Also :