मुंबई : सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये चलबिचल सुरू आहे. तसेच महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा फटका राज्य सरकारला बसु शकतो. मात्र यावर स्वाभिमानी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांनी याविरोधात भुमिका घेत मोठा पेच निर्माण केला आहे.
“कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी क्षीरसागरांवर “; ठाकरेंचे आदेश
कोल्हापुरात राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी संघटनेची बैठक होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडायचं की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तशा प्रकारच्या सुचना राजू शेट्टी यांनी देखील कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
“२० वर्षांपासून सातत्याने भ्रष्टाचार करणाऱ्या दरेकरांची आमदारकी काढा”; काँग्रेसची आक्रमक मागणी
राजू शेट्टी यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेत विरोध केला आहे तर देवेंद्र भुयार यांनी म्हटलं की, भाजपला जे प्रश्न सोडवता आले नाहीत, ते महाविकास आघाडी सरकारने सोडविले आहेत. शेतकी कर्जमाफी आणि शेतमालाला भाव असे अनेक प्रश्न सरकारने सोडविले आहेत. त्यामुळे सरकारमधुन बाहेर पडण्याचं काय कारण देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा; मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी यावरून शिवसेनेची टीका
दरम्यान, सरकारमध्ये असताना पुरग्रस्तांचे प्रश्न, दोन टप्प्यांतील एफआरपी, वीजकपात आणि वीजबील वसुली हे प्रश्न सुटले नाहीत. पंरतु आम्ही सरकारमध्ये असूनही या प्रश्नांसाठी लढत राहणार असं राजू शेट्टींनी म्हटलंय. तर स्वाभिमानीचे आघाडीशी कुठल्या मुद्यावर बिनसले हे मला माहिती नाही. मात्र निर्णय घेताना मला विश्वासात न घेतल्यास मी माझा निर्णय घेईन, मी त्यांच्याशिवाय आघाडीत राहु शकतो. असं देवेंद्र भुयार यांनी सांगितलं आहे.
Read also:
- शिवसेनेनं मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी; संजय राऊतांनी स्पष्टचं केलं
- 13 सहकारी कारखाने पवार कुटुंबीयांनी हटप केले; लिलाव काढून 400 कोटी कारखाना 10 कोटीला
- मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असल्याने माझा छळ; एकनाथ खडसेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप
- आपची राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर ; मात्र मराठी अभिनेता संदीप पाठकची प्रतिक्रिया व्हायरल
- सोलापुरात सचिन वाझे पॅटर्न स्टिंग ऑपरेशनमुळे महाविकास आघाडीला दुसरा धक्का