मुंबई : सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये चलबिचल सुरू आहे. तसेच महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा फटका राज्य सरकारला बसु शकतो. मात्र यावर स्वाभिमानी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांनी याविरोधात भुमिका घेत मोठा पेच निर्माण केला. त्यामुळे स्वाभिमानी पक्षातून राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांची हाकालपट्टी केली आहे.
मुख्यमंत्री काश्मीर, दिल्लीला गेले पण भ्रष्टाचारावर बोलले नाहीत; फडणवीसांचा टोला
राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. कोल्हापुरात राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी संघटनेची 5 एप्रिलला बैठक होणार आहे. या बैठकीत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्याचे सूतोवाच आहे. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडायचं की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तशा प्रकारच्या सुचना राजू शेट्टी यांनी देखील कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा ‘योगीराज’ सुरू; 50 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
देवेंद्र भुयार हे गेल्या कित्येक दिवसांपासून पक्षप्रमुखांच्या संपर्कात नव्हते. तसेच पक्षांच्या कोणत्याही कार्यक्रमाला ते उपस्थित राहत नव्हते. त्याचबरोबर मतदारसंघात देखील त्यांच्यावर नाराजीचा सुर होता. हिवरखेड याठिकाणी घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात पक्षप्रमुख राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांची पक्षातून हाकालपट्टी करत असल्याची घोषणा केली आहे. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत, फटाकेफोडत आनंद साजरा केला.
एखादा पेताड असला तर तो रात्री पेंगतच येणार; अजित पवारांच्या फडकेबाजीवर हशा पिकला
दरम्यान, राजू शेट्टी यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेत विरोध केला आहे तर देवेंद्र भुयार यांनी म्हटलं होतं की, भाजपला जे प्रश्न सोडवता आले नाहीत, ते महाविकास आघाडी सरकारने सोडविले आहेत. शेतकी कर्जमाफी आणि शेतमालाला भाव असे अनेक प्रश्न सरकारने सोडविले आहेत. त्यामुळे सरकारमधुन बाहेर पडण्याचं काय कारण देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- बच्चू कडूंच्या आईच्या तेरविच्या कार्यक्रमात पोलिसानी गायले भजन; प्रचंड व्हायरल
- ” एसटी कर्मचाऱ्यांना आता ३१ मार्चचा शेवटचा अन् अंतिम अल्टिमेटम “; परिवहनमंत्री अनिल परब
- सतेज पाटीलांसह त्यांच्या कुटुंबिंयाबाबत ईडीकडे तक्रार करणार; कोल्हापूर उत्तरेत राजकारण तापलं
- “ठाकरेंकडे शक्तिशाली टोमणा बॉम्ब”; फडणवीसांनी उडवली मुख्यमंत्री ठाकरेंची खिल्ली
- पुण्यासाठी नवा विमानतळ द्यावा; वंदना चव्हाणांची राज्यसभेत मागणी