परभणी : माजी खसदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज परभणीत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. शहरातील संत तुकाराम महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. यावेळी राजू शेट्टी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टिका केली आहे.
पिस्तुल काढणं, सोडून द्या…अन्..”; आदित्य ठाकरेंचा वेदांत प्रकल्पावरून शिंदेंवर निशाणा
“हे सरकार हार-तुरे अन् उत्सवांमध्ये व्यस्त, विरोधकही काही बोलत नाहीत. त्यांना सामान्य, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नाही. त्यात आता विरोधकही काही बोलत नाहीत. हे सरकार सामान्य जनतेचे नाहीच. सामान्यांना मदत मिळत नसेल, तर हे सरकार काय कामाचे आहे, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
“जनता तुमच्या ५० पैकी ४५ आमदारांचा नक्की पराभव करणार”; राष्ट्रवादीचा शिंदेंवर निशाणा
राज्यात अतिवृष्ठी झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा सरकारकडून दुजाभाव केला जात आहे. ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार आहे, त्या ठिकाणी तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली. तर सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या ठिकाणी भरघोस मदत देण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्येसुद्धा सरकार दुजाभाव करत आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
“पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंचा राजीनामा घेऊन मोकळे सोडले पाहीजे”
कालपासून मी मराठवाड्यात आहे. कापूस तर पूर्ण नष्ट झालेला आहेच. सोयाबीन आणि मुगाचा पत्ता नाही. 22 ते 28 दिवस पावसाचा मध्ये खंड पडला. त्या काळामध्ये सोयाबीनला पाण्याची गरज होती. मात्र त्याला शेंगही आली नाही. ते केवळ दिसायला हिरवेगार दिसते. अशावेळी प्रशासनाने मदत देणे गरजेचे आहे. 100 कोटींची एफआरपीची थकबाकी आहे. साखर सम्राट मोकाट सुटलेले आहेत. बोगस बियाणे कंपन्यांनी सुळसुळाट घातला आहे. मात्र त्यांच्यावर कृषी विभाग कारवाई करत नाही, अशी टिका करत. सरकार कार्यकाळ पुर्ण करणार नाही, त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.
Read also
- “पोलीस ठाण्यात जाऊन माझं काम मी इमानदारीनं केलंय”; नवनीत राणा
- “13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं, तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही”; किशोरी पेडणेकर
- “शहाजी पाटलांनी माझ्याकडे यावं, त्यांना मातोश्रीवर चांगली खुर्ची देतो”
- “सांग सांग भोलानाथ हा बालिश प्रश्न शेलारांनी मुनगंटीवारांना विचारला पाहिजे”; सेनेचं प्रत्युत्तर
- “आरती सिंग दर महिन्याला वसुली करून पैसे ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या”; रवी राणांचा गंभीर आरोप