मुंबई : सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये चलबिचल सुरू आहे. तसेच महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा फटका राज्य सरकारला बसु शकतो. मात्र यावर स्वाभिमानी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांनी याविरोधात भुमिका घेत मोठा पेच निर्माण केला. त्यामुळे स्वाभिमानी पक्षातून राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांची हाकालपट्टी केली आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून केलेल्या चर्चावर आज पूर्णविराम देत राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
त्यांची मानसिक तयारी होती तर..; इडीने राऊतांवर केलेल्या कारवाईवर भाजप नेत्यांची प्रतिक्रिया
कोल्हापुरात राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी संघटनेची 5 एप्रिलला बैठक झाली आहे. या बैठकीत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्याचे सूतोवाच केले होते. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडायचं की नाही, याबाबत निर्णय घेतला आहे. शेतकऱ्य़ांचे प्रश्न सोडण्यात महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. केंद्र सरकारने उपेक्षीत नागरिकांना उद्धवस्त केलं आहे. निवडणुक लढवता यावी म्हणून आपण चळवळ उभी केली नाही तर चळवळ टिकावी म्हणून आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
इडीचा संजय राऊतांना मोठा दणका; अलिबागजवळील जमीन, दादरमधील फ्लॅट जप्त
देवेंद्र भुयार हे गेल्या कित्येक दिवसांपासून पक्षप्रमुखांच्या संपर्कात नव्हते. तसेच पक्षांच्या कोणत्याही कार्यक्रमाला ते उपस्थित राहत नव्हते. त्याचबरोबर मतदारसंघात देखील त्यांच्यावर नाराजीचा सुर होता. हिवरखेड याठिकाणी घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात पक्षप्रमुख राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांची पक्षातून हाकालपट्टी करत असल्याची घोषणा केली आहे. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत, फटाकेफोडत आनंद साजरा केला.
शिवसेनेचे खासदार राष्ट्रवादीवर नाराज; दिल्लीतील बैठकीत महाविकास आघाडीत ‘बिघाडी’
दरम्यान, राजू शेट्टी यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेत विरोध केला आहे तर देवेंद्र भुयार यांनी म्हटलं होतं की, भाजपला जे प्रश्न सोडवता आले नाहीत, ते महाविकास आघाडी सरकारने सोडविले आहेत. शेतकी कर्जमाफी आणि शेतमालाला भाव असे अनेक प्रश्न सरकारने सोडविले आहेत. त्यामुळे सरकारमधुन बाहेर पडण्याचं काय कारण देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- ‘मविआ’ मंत्रिमंडळात होणार मोठे फेरबदल; नाना पटोलेंची काँग्रेस हायकमांडकडे सेटिंग
- देशात खरंच लोकशाही राहिली आहे का? राऊतांवरील इडीच्या कारवाईनंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
- राजकीय वातावरण तापलं! इडीची राऊतांवरील कारवाई अन् भाजपच्या माजी मंत्र्यांला 3 महिन्यांचा कारावास
- “संजय राऊत हे धुतल्या तांदळाचा माणूस नाही”; इडीच्या कारवाईनंतर निलेश राणेंची प्रतिक्रिया
- “माझ्या हत्येचा हिरेन पांड्या करण्याचा संबंधितांचा प्लॅन”; इडीच्या कारवाईनंतर राऊतांचा गंभीर आरोप