मुंबई : विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन ८ महिन्यापासून सुरु असलेलं राजकारण आणि त्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री (महाविकास आघाडी सरकार) यांच्यात चालू झालेला संघर्षावर चर्चा करण्यासाठी आणि निर्णयाप्रत येण्यासाठी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली. या भेटीतून १२ जणांच्या यादीतील काही नावांबाबत राज्यपालांचा आक्षेप असल्याचे वृत्त आहे.
12 आमदारांच्या यादीत राष्ट्रवादीकडून ढवळाढवळ; राजू शेट्टी यांचा केला “करेक्ट कार्यक्रम”
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे दिलेल्या १२ सदस्यांच्या यादीत बदल केल्याचं वृत्त असून, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हेमंत टकले यांच्या नावाचा समावेश केला असल्याचे वृत्त आहे. तसेच, यादीतून राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आले असल्याचे जवळजवळ पक्के झाले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर, आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काही नावांवर राज्यपालांचा आक्षेप, आता अजित पवारांनी केले राजू शेट्टींच्या आमदारकीवर भाष्य
“१२ आमदारांच्या संदर्भात गेल्या सव्वा वर्षात कोणासोबतही चर्चा झाली नसून, लोकसभा निवडणुकीआधी दिल्लीत मी आणि शरद पवारजी भेटलो असताना, त्यांच्याकडे संघटनेला लोकसभेच्या २ जागा द्याव्यात अशी मागणी केली होती. त्याऐवजी राष्ट्रवादीच्या कोट्यातील विधान परिषदेची एक जागा देण्याचे त्यांनी कबूल केले होते. ही जागा तुम्ही स्वतः स्वीकारावी, अशी विनंतीही त्यांनी केली होती. त्यामुळे आता ती जागा महत्त्वाची नाही. द्यायचं-नाही द्यायचं, हा त्यांचा प्रश्न आहे”, असं ते म्हणाले.
महाराष्ट्रात पुन्हा Lockdown? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
दुसरीकडे, राजू शेट्टींच्या आमदारकीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलं असून, एका नियमाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले आहे, “निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीला, राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्त करता येत नाही, असा नियम आहे, याची शहानिशा सुरू असून, काही अडचण आली, तर मुख्यमंत्री निर्णय घेतील.” त्यामुळे, या नेत्यांच्या विधानावरून राजू शेट्टींना घेऊन नक्कीच काहीतरे मोठा निर्णय घेतला जात असल्याचे दिसून येत आहे.
Read Also :
- विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – विनायक मेटे
- “त्यावेळी कुठे गेला कायदा? नवाब मलिकजी…”, CBI च्या कारवाईवरून भाजप-राष्ट्रवादीत वाक्युद्ध
- “शिवसेनेला मराठवाडा-विदर्भात भाजपने वाढवलं”, चंद्रकांत पाटलांचं विधान
- देशमुखांच्या जावयावर केलेल्या कारवाईनंतर, सुप्रिया सुळेंचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप
- अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, मुंबई उच्च न्यायालयाने केली अडचणीत वाढ