चंद्रपूर: माझ्या कार्यकाळात खुप चांगली कामे झालीत. त्यामुळे विरोधक आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून विविध कामांमध्ये दिरंगाई, अनियमितता झाल्याचा आरोप करणार्या आमदार किशोर जोरगेवार यांनी आधी ज्या घोषणेच्या भरवश्यावर मतदार संघात मते मागितली आणि निवडून आले, त्या २०० युनिट मोफत विजेचे काय झाले ते सांगावे असा प्रतिप्रश्न चंद्रपूर मनपाच्या महापौर राखी कंचर्लावार यांनी केला आहे.
हे पण वाचा: संजय जाधवांच्या विधानावर भाजपाने दिली प्रतिक्रिया, “तुम्ही काहीही करा पण…”
कंचर्लावार यांच्यावर केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरणही त्यांनी दिले. महानगरपालिकेची गाडी ही काही मी घरी घेऊन जाणार नाही किंवा त्या ‘व्हिआयपी’ क्रमांंकाचाही उपयोग मला आजन्म होणार नाही. खरे तर, मी गाडी आणि त्याचा तो खास क्रमांक प्रशासनाला मागितला नाही. कोणती कामे पदाधिकारी करतात आणि कोणती कामे प्रशासकीय अधिकारी करतात, हे आधी आरोप करणार्यांनी जाणून घ्यावे आणि मग आरोप करावेत. अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम हे नियमाप्रमाणेच होत आहे. कंत्राटदारांनी १२ झोन ठरवले आहे आणि टप्प्याटप्प्याने एक-एक झोनचे काम सुरू आहे.
हे पण वाचा: अविनाश भोसलेंना ईडीचा दणका, पुण्यातील तब्ब्ल ४ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच
ज्या ज्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत, त्या आम्ही कंत्राटदाराकडून सोडवून घेत आहोत. २०० कोटीचा असा कुठलाच घोटाळा मनपात झाला नाही. त्याबाबत जी काही चौकशी होणार असेल, ती होईल. डॉ. मंगेश गुलवाडे यांच्यावरील आरोपांबाबत चौकशी होत आहे. त्यांच्यावर रिकव्हरी काढली गेली आहे याचाच अर्थ आमचा काही हस्तक्षेप नाही. चौकशीअंती खरे काय ते समोर येईलच, अशा विविध प्रश्नांवर राखी कंचर्लावार, राहूल पावडे आणि रवी आसवानी यांनी पत्रकारांना उत्तर दिले.
हे पण वाचा: मुख्यमंत्र्यांचे एकच धोरण, सगळं केंद्राने करावं, द्याव; मी घरात बसणार किंवा मर्सिडीज चालवणार
२०० युनिट मोफत विजेचा विषय हा चांगला आहे. त्याला आमचे समर्थन आहे. पण ज्यांनी याची जबाबदारी घेऊन, जनतेला आश्वासन देऊन निवडूक जिंकली आणि सत्तेतही सहभागी झाले, त्यांनी हा विषय मार्गी लावला पाहिजे. आपण काहीच करायचे नाही आणि दुसर्यावर आरोप करायचे असे कसे चालेल, असा प्रतिप्रश्नही कंचर्लावार यांनी उपस्थित केला. आमचे आंदोलन हे पूर्व नियोजितच होते, असेही स्पष्टीकरण कंचर्लावार यांनी यावेळी दिले.
Read Also :
- पेगाससने नाही तर मग देशात येऊन कुणी हेरगिरी केली?; नवाब मलिक यांच्या केंद्र सरकारला सवाल
- केंद्राने खाऊचा डबा दिला, पण डबा रिकामाच आहे, घटना दुरुस्ती विधेयकावरून राऊतांची खोचक टीका
- शिवसेनेचे शिवाजी पार्कसोबत खास नाते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यादांच आमदार निधीतून करणार सुशोभिकरण
- कपिल सिब्बल यांच्या डिनर पार्टीत, २०२४ मध्ये भाजप मुक्तची घोषणा, अशी असणार रणनिती
- बीड जिल्ह्यामधून निघणाऱ्या डॉ. भागवत कराड यांच्या ‘जनआर्शिवाद’ यात्रेला, पंकजा मुंडेसह कार्यकर्त्यांचा विरोध