5 ऑगस्टला अयोध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिपूजनाला जाऊ नये असे विहिंपने म्हटले होते. आता याला शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
राममंदिर हा शिवसेनेसाठी राजकारणाचा नव्हे, तर श्रद्धा, अस्मिता आणि भक्तीचा विषय असल्याचे म्हटले आहे. सोबतच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नसतानाही अयोध्येला गेले होते. हा श्रद्धा आणि भक्तीचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, वसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसतानाही अयोध्येत गेले होते. मुख्यमंत्री बनल्यानंतरही त्यांनी अयोध्येत जाऊन दर्शन घेतले होते. राममंदिर आस्था व भक्तीचे प्रतीक आहे, त्यामुळे यात राजकारण कसले? कोरोनाचे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. जनतेला या संकटातून बाहेर काढण्याची सरकारची प्राथमिकता आहे.