मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टिका करताना राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसमुळे जातीयवाद वाढला असल्याचा आरोप केला होता. शरद पवारांच्या भाषणांत कधीही छत्रपतींचा उल्लेख नसतो. असंही ते म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिपांईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“कोणीही येऊन काहीही बोलतं”; भोंग्यांवरुन राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला राऊतांचा टोला
राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर रामदास आठवले यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले की, शरद पवार जातीयवादी नाहीत, हा आमचा अनुभव आहे. मशिदीवरील भोंगे विरोधात राज ठाकरे यांची भूमिका निषेधार्ध आहे. भोंगे काढण्याचा आग्रह ही धर्मनिरपेक्षतेविरोधात भूमिका आहे. सर्वांना आपल्या धर्मानुसार आचरणाचा हक्क आहे. मंदिरांवर भोंगे लावून हनुमान चाळीसा पठण करा. मात्र मशिदीवरील भोंगे काढण्याचा अट्टाहास चुकीसा आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
सदावर्तेंचा ताबा आता सातारा पोलिसांकडे! 60 ते 70 पोलिसांच्या बंदोबस्तात साताराकडे रवाना
रिपल्बिकन पक्षातील सर्व गट-तट बंद होऊन एकच पक्ष निर्माण होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर पुढे आल्यास तेच या पक्षाचे अध्यक्ष असतील. आपण कोणतेही पद घेऊन काम करू , परंतु प्रकाश आंबेडकर हे ऐकत नाहीत. असा अनुभव देखील त्यांनी कथन केला.
उद्धवा.. अजब तुझे सरकार! राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, शरद पवार यांच्याकडे घेण्यासारखे अनेक गुण आहेत. परंतु स्वार्थी राजकारणासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जन्मानंतर जातीयवाद महाराष्ट्रात पसरला त्याच काय करायचं.? प्रत्येक जातीचा माणूस शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी लढला. शिवरायांचा इतिहात घराघरात पोहचणे महत्वाचे आहे. मात्र तो कुणी लिहीला. यावरून राजकारण केलं जात आहे. जाती-पातीत महाराष्ट्र अडकला गेला. महाराष्ट्राला कुणीही हरवू शकत नाही. मात्र राज्यातील जातीचे राजकारणच आपल्याला हरवेल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.
Read also:
- “जे कोणी आडवे येतील ते नष्ट होतील”; मोहन भागवत यांनी केलं अखंड भारताविषयी वक्तव्य
- “पहिले सारखे राज ठाकरे राहिले नाहीत, ते भाजपमुळे झाकोळले गेले;” काॅंग्रेसची राज ठाकरेंवर टिका
- भाजपच्या आमदारावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल! मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्याचा ठपका
- “स्वत: शेण खाणारे दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, त्यांचे पितळ उघडे पडले आहे”;
- हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, मात्र हिंदुत्व हा भाजपचा श्वास; चंद्रकांत पाटील