देशात सध्या कोरोना विषाणूचं संकट आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यात ठाकरे सरकारने या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ते अपयशी ठरलेले आहेत, असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चाललेली आहे. सामना पेपर चालवणं हे सोपं काम आहे. मात्र, कोरोनाचा सामना करणे हे सोपे काम नाही, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आता लक्षात आलेलं आहे. त्यामुळे कोरोना वर उपाय योजना करण्यात सरकार कमी पडलेलं आहे.
आज जर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असतं तर स्वतः देवेंद्र फडणवीस हे रस्त्यावर उतरले असते. सध्याचे मुख्यमंत्री हे घरात बसून केवळ आदेश देण्यात मग्न आहेत. अशाने या परिस्थितीवर नियंत्रण कसे आणणार. ठाकरे सरकारला कोरोना वर मात करायला अपयश आले असल्याची टीका आठवले यांनी केली.