वर्धा : भाजपचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने कुटुंबियांवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. तसेच, न्यायासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे दरवाजे ठोठावले होते. मदतीसाठी याचना करणारा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यात त्यांनी कुटुंबीयांकडून आपल्याला बेदम मारहाण होत असल्याचं म्हटलं होतं. तसेच, व्हिडिओत त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांकडे मदतीची मागणी केली होती.
भाजप खासदाराच्या सुनेचे कुटुंबियांवर गंभीर आरोप, राष्ट्रवादीकडे केली मदतीची मागणी
या सगळ्या प्रकरणात आता नवीन वळण आले असून, या सगळ्या प्रकारानंतर अवघ्या १२ तासांतच तडस यांचा मुलगा पंकज याने पूजाशी वैदिक पद्धतीनं विवाह केला आहे. तसेच, त्यांनतर पूजा यांनी आपली कुठलीही तक्रार नसल्याचं म्हणत, तक्रार मागे घेतली असून, “सकाळी मी खूप पॅनिक झाले होते. मला खूप भीती वाटली. म्हणून मी तक्रार केली होती. आता माझी त्यांच्याबद्दल कुठलिही तक्रार नाही,” असं त्यांनी म्हटलं.
सुनेच्या गंभीर आरोपानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
त्यांनतर यावर पंकज तडस यांनी देखील, “आपण आधीही खूश होतो, आताही आहोत. मी या आधीही पूजाला स्वीकारलेलं होतं. आत्ताही स्वीकारतो आहे. पूजाशी मी स्वतः लग्न केलं होतं. आता त्यांच्या इच्छेनुसार वैदिक पद्धतीनं लग्न केलं आहे. या प्रकरणात काहींनी राजकीय सुपारी घेतली होती, आता प्रश्न मिटला आहे. माझ्या वडिलांचा आणि माझा कोणताही संबंध नाही. मात्र या सगळ्यात माझ्या वडिलांना आणि परिवाराला गोवण्याचं काम सुरु आहे,” असं त्यांनी म्हटलं.
“तुम्ही मराठी माणसाला सत्तेसाठी वाऱ्यावर सोडलं,” राऊतांवर भाजपचा पलटवार
दरम्यान, प्रकरणावर आता रामदास तडस यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. “मुलगा आणि सूनबाई लग्नानंतर कुटुंबापासून वेगळे राहतात. त्यांची ही वैयक्तिक नवरा-बायकोची भांडणं आहेत. यामध्ये राजकारण कुठून आलं, मला माहिती नाही. त्यांच्या भांडणात मी मध्यस्थाची भूमिका निभावली. मी पूजाला अजूनही सून मानतो. त्यामुळे, दोघांनीही माझ्याकडे राहायला यावं,” असं सांगत, “या सगळ्या प्रकरणात माझी काहीच भूमिका नाही,” असं ते म्हणाले होते.
Read Also :
- “नांदेड फक्त झलक, आवाज उठवायचा म्हटलं तर…” संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा
- राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? मलिकांचं मोठं विधान; केली ‘मिशन ११४’ ची तयारी सुरु
- शिवसेना-काँग्रेसच्या मंत्र्यांवर राष्ट्रवादी नाराज? मलिकांनी स्पष्ट केले कारण
- दाऊदला पाठवले तरी भीत नाही, मी घोटाळे उघडकीस आणणार – किरीट सोमय्यांनी ललकारले
- चिपी विमानतळ उद्घाटन, राणे म्हणाले मुख्यमंत्र्यांची गरज काय? भाजप नेते म्हणतात…