कोरोनामुळे देशात काहीसं चिंतेच वातावरण असताना भाजपचे नेते आणि मध्य प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. राम मंदिराच्या कामाला सुरूवात झाल्यानंतर देशातील कोरोना महामारी संपेल, असं विधानसभा अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी म्हणाले
याबाबत बोलताना ते म्हणले श्री राम यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आणि राक्षसांना मारण्यासाठी त्यावेळी पूनर्जन्म घेतला होता. राम मंदिराचे बांधकाम सुरू होताच देशभरात पसरलेली करोनाची महामारी नष्ट होण्यासही सुरूवात होईल, तसेच कोरोनामुळे फक्त भारतच नाही, तर संपूर्ण जग त्रस्त झालं आहे. आम्ही केवळ सोशल डिस्टन्सिगच पाळत नाही, तर देवांचं नामस्मरणही करत आहोत. राम मंदिर बांधण्याचे सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिलेले आहेत, असं शर्मा म्हणाले