‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी गणेशोत्सवाला कात्री लावायचे ठरवले आहे. पुणे, मुंबईसह अनेक शहरातील लोक गणेशोत्सवासाठी गावी जातात. यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना कोकणात प्रवेश दिला जाणार का, असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. यांवरून नारायण राणे यांनी सर्तकरला आंदोलनाचा इशारा दिला होता. तर भाजप नेते आशिष शेलार यांनीही चाकरमान्यांना कोकणात जाऊ देण्याची मागणी केली होती
गणेशोत्सवातील या कोकण प्रवसावरून सध्या राजकीय नेत्यांमध्ये वादग्रस्त वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर कोकण प्रवासाबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज बैठक घेतली मात्र या बैठकीला राणे कुटुंबियांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे नितेश राणे यांनी महाविकासआघाडी आणि सरकारण हल्लाबोल केला आहे. परिवाहन मंत्री नी गणेश चतुर्थी साठी बोलावलेली बैठक हि फक्त शिव सेनेची आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित कळलेलं आहे.
तसेच “बैठीकीच आमंत्रण नाही किव्हा माहिती हि नाही ! असे नियोजन करून कोणाचा फायदा होणार आहे ?? कोकणाच अजुन किती नुकसान करणार हे सरकार ??” असे अनेक सवाल उपस्थित करत त्याने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
परिवाहन मंत्री नी गणेश चतुर्थी साठी बोलावलेली बैठक हि फक्त शिव सेनेची आहे का ?
बैठीकीच आमंत्रण नाही किव्हा माहिती हि नाही !
असे नियोजन करून कोणाचा फायदा होणार आहे ??
कोकणाच अजुन किती नुकसान करणार हे सरकार ??— nitesh rane (@NiteshNRane) July 14, 2020