राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र या सरकारच्या गाडीचं स्टीरींग कोणच्या हातात आहे उद्धव ठाकरे कि अजित पवार यावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे. मात्र रावसाहेब दानवे यांनी या प्रकाराव महाविकास आघाडीओ सरकारला जोरदार टोला लगावला आहे.
“महाविकास आघाडी सरकारच्या गाडीचं स्टिअरिंग हे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या हातात आहे. तर तिसरा पार्टनर मागे बसून सांभाळून चालवा रे आम्ही मागे बसलो आहोत, असं सांगत आहे. दोघांच्या हातात स्टिअरिंग असल्यामुळे ही गाडी झाडावर आदळणार आहे”, असा टोला भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.
“गाडी एक आणि चालवणारे दोन आहेत, स्टिअरिंग दोघांच्या हातात आहे. पण राज्याच्या कारभाराचे स्टिअरिंग एकाच्या हातात असलं पाहिजे. स्टिअरिंगवरील हात निसटला तर अपघात होऊ शकतो”, असं दानवे म्हणाले. त्याचबरोबर “त्यांच्याकडे लायसन्स आणि इन्शुरन्सही नाही”, अशी मिश्किल टिप्पणीदेखील रावसाहेब दानवेंनी यावेळी केली.