देशातील सर्व यंत्रणा कोरोनाशी लढत असतांनाही राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना बरखास्त करुन प्रशासक नेमण्याचा घाट घातला आहे.
आपल्या पक्षाच्या कार्यक़र्त्यांना ग्रामपंचायतींवर बसविण्याचा हा डाव आहे. शासनाने काढलेल्या आदेशात सरपंच व सदस्यां व्यतिरिक्त योग्य व्यक्तीस प्रशासक म्हणून बसवावे असे नमुद केले आहे याचा अर्थ गावानी निवडुन दिलेलेमसरपंच आणि सदस्य योग्य नाहीत काय याचा खुलासा सरकारने करावा असा सवाल गंगाखेडचे रासप आमदार रत्नाकरराव गुट्टे यांनी केला आहे.
कोरोनाचं संकट किती दिवस चालेल हे सांगता येत नाही मात्र या संकटकाळात गावकर्यांच्या आरोग्याबाबत अत्यंत जागरुक राहून उपाययोजना करणार्या सरपंचांवर अचानकपणे बरखास्तीचा बडगा या सरकारने उगारलाय. विशेष म्हणजे यातून गावा गावात राजकीय कलह निर्माण होतील याचा ताण प्रशासन यंत्रणेवर पडेल. सरकारकडून त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रशासक म्हणून बसविण्यासाठी प्रयत्न होत आहे त्यामुळं गावा गावातील वातावरण कलुषित होणे जवळपास निश्चित आहे त्यातून वाद विवादही होतील.
असे असले तरी संकटकाळात कोविड बाबत करावयाच्या उपाययोजनांना मात्र ब्रेक लागू शकतो याचा परिणाम म्हणून कोरोना गावात गावात नाही तर घरा घरात शिरेल आणि मोठं संकट ओढावेल त्यामुळं सरपंचाची बरखास्त करण्यास आपला कडाडून विरोध आहे. असेही रत्नाकरराव गुट्टे म्हणाले