अमरावती : अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी वसुली पथक नेमले होते. या वसुलीमुळेच अमरावतीत गुन्हे वाढले, दंगली झाल्या, उमेश कोल्हेंची हत्या झाली. अमरावतीत गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. सोबतच आरती सिंग दर महिन्याला अमरावतीमधून सात कोटी रुपयांची वसुली करत असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर केला आहे.
“हिमंत असेल तर मोदी साहेबांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा”; अजित पवार
अमरावती पोलिस आयुक्त आरती सिंग या ठाकरे सरकारसाठी वसूली करत होत्या. तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अवैधपणे केलेली वसुली पाठवली असल्याचा धक्कादायक आरोप अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. आरती सिंग यांनी दर महिन्याला अमरावतीमधून सात कोटी रुपयांची वसुली केली असून त्यातील काही पैसा उद्धव ठाकरे यांना पोहोचवला असल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.
सोमय्यांचा घाव अनिल परबांवर बसला..! रिसोर्ट तुटणार, परब अडकणार..?
महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता काळात अमरावतीच्या पोलीस आयक्त आरती सिंग यांना एकसूत्री कार्यक्रम देण्यात आला होता. राणा दाम्पत्यावर जेवढे गुन्हो दाखल करता येतील तेवढे गुन्हे दाखल करण्याचे आणि कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. उद्धव ठाकरेंना खुस करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असा आरोप राणांनी केला आहे.
तो 12 हजार कोटींचा ‘दंड पेंग्विन’ सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का ?” भाजपचा सवाल
महापालिका आयुक्तांवर शिवप्रेमींनी शाईफेक केली होती. त्यावेळी मी अमरावतीत उपस्थित नसतानाही माझ्यावर 307 आणि 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात आला. तेव्हा माझ्या घरी पोलीस पाढवून नजरकैदेत ठेवण्यात आले. आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले, असा आरोप करत. आमच्या विरोधात दाखल केलेले खोटे गुन्हे आणि आरती सिंग यांनी केलेली अवैध वसुली या संदर्भात तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. आमच्याकडे त्या संदर्भात ऑडिओ क्लिप देखील आहेत. हे सगळे पुरावे योग्य वेळी सीआयडीला देणार असल्याचे आमदार रवी राणा म्हणाले.
Read also
- पिस्तुल काढणं, सोडून द्या…अन्..”; आदित्य ठाकरेंचा वेदांत प्रकल्पावरून शिंदेंवर निशाणा
- “जनता तुमच्या ५० पैकी ४५ आमदारांचा नक्की पराभव करणार”; राष्ट्रवादीचा शिंदेंवर निशाणा
- “पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंचा राजीनामा घेऊन मोकळे सोडले पाहीजे”
- “उद्धव ठाकरेंनी हा अस्वल कुठून निवडला होता माहित नाही?”; भास्कर जाधवांची बांगरांवर टिका
- “दादा वॉशरूमला गेले होते रे, आता पुढच्या नाराजी पर्यंत तरी चर्चा बंद करा”