नवी दिल्ली – राज्यात गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंगे, हनुमान चालीसा आणि हिंदुत्व यावर राजकीय वाद चालू आहेत त्यातच आता नव्या वादाचं कारण म्हणजे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी. औरंगाबाद दौऱ्यावर असलेले एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी हे औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नतमस्तक झाले. ओवेसींच्या या कृतीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या घटनेवरून आमदार रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी अन् मनसेचे नेते लावले गळाला; पुण्यात पार पडला पक्षप्रवेश
“छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, संभाजी राजेंच्या विचारांचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रात संभाजी नगर येऊन ओवेसी फुलं वाहतात. माझ्या राजकीय जीवनामध्ये आतापर्यंत ती कबर कोणी उघडली, तिथं फुलं वाहिली हे मी फक्त उद्धव ठाकरे सरकारच्या काळात पाहिलेलं आहे,” असं रवी राणा म्हणालेत.
राष्ट्रवादीत इनकमिंगचा धडाका; विविध पक्षातील नेत्यांनी बांधले घड्याळ
“आम्ही हनुमान चालिसा वाचतो तर खासदार आमदाराला तुरुंगात टाकलं जातं. देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. उद्याच्या सभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना माझा सवाल आहे. जर तुम्ही हिंदुत्वाच्या एवढ्या गोष्टी करता, खरं तुम्ही हिंदू असाल तर हनुमान चालिसाचं वाचन करुन सभेची सुरुवात कराल की संभाजीनगरमध्ये औरंगजेबच्या कबरवर फुलं वाहायला जाल, असा महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदूंचा तुम्हाला सवाल आहे,” असं राणा म्हणालेत.
राज्यसभेच्या 6 खासदारांसाठी निवडणुक जाहीर; राऊत, गोयल, पटेल यांना मिळणार पुन्हा संधी?
नेमकं काय घडलं?
अकबरुद्दीन ओवैसी गुरुवारी औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यांनी खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीला यावेळी भेट दिली. त्यांच्यासोबत इम्तियाज जलील, वारिस पठाण असे एमआयएमचे इतर नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते. मात्र, महाराष्ट्राचा शत्रू असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर ते गेल्यामुळे त्यावरून आता वाद सुरू झाला आहे. या घटनेची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहेत.
Read also:
- हिंदूजननायक म्हटले तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण काय?
- संजू आत्या गेल्या, अन् शेवटचा दुवाही निखळला; ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले; उद्धव ठाकरे
- रामदास कदमांची लवकरच नव्या जोशात शिवसेनेत दुसरी इनिंग सुरु होणार?
- मुंबै बॅंक बोगस निवडणुक प्रकरणात दरेकरांना अटक होण्याची शक्यता? मुंबई पोलीस दाखवणार खाक्या
- “तुम्हाला एवढीच हौस आहे, तर राजद्रोहाचा गुन्हा ओवैसींवर लावा”, ठाकरे सरकारला राम कदम यांचं खुलं आव्हान!