मुंबई : एक वर्षापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. महाविकास आघाडीचं सरकार शिंदेंच्या बंडाळीनंतर कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांचं बंड यावरून देशभरात एव्हाना राज्यात याची सर्वदुर चर्चा सुरू झाली. याबाबत आता शिवसेनेचे आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी यावर भाष्य केलं आहे. त्यावर आता ठाकरे गटातील नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
हेही वाचा…“संजय शिरसाट नावाच्या लिंग पिसाटाचे कान टोचणे बाबत..”, रूपाली पाटलांचा शिरसाठांवर हल्लाबोल
२०१९ सालचा सत्ताबद्दल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी घडवून आणला असल्याचा गौप्यस्फोट तानाजी सावंत यांनी केला. नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो जनतेने कलही आमच्या बाजूने दिला. मात्र उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. ते सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी आमदारांचे कौन्सिलिंग करण्यासाठी दीडशे बैठका घेतल्या असंही तानाजी सावंत यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“नेतेच चमडी बचाव पवित्र्यात राहिले तर, रंगा बिल्ला यांच्या तावडीतून लोकशाही कोणीही वाचवू शकणार नाही”
ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरून शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, याचा अर्थ सुस्पष्ट आहे, हे लोक म्हणत होती, उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नाहीत. निधी मिळत नाही. अजित पवार आणि राष्ट्रवादी त्रास देते. या सगळ्या पोकळ गप्पा हे लोक मारत होते. यांच्या मनातच दुहीचं आणि गद्दारीचं बीज आधीपासूनच पेरलेले होते. सावंतांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होतं, यांना गद्दारी करायची होती. अशी टिका त्यांनी केली आहे.
Read also
हेही वाचा…“डंके की चोट पे…!” गुणरत्ने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द
हेही वाचा…“कसब्याचा पराभव हा पराभव नाही..आम्ही कसबा पुन्हा जिंकणारच”, चंद्रकांत पाटील
हेही वाचा…“७२ कोटी रुपयांतून शिरसाठांना ब्लॅकमेल करत पाच कोटी रुपये मागणारी जीवाभावाची बाई कोण?” रूपाली पाटलांचा सवाल
हेही वाचा…चंद्रकांत पाटलांचा ते विधान, त्यावर कुणाल टिळकांचं प्रत्युत्तर म्हणाले, “माझी आई..”
हेही वाचा…“सरकार पाडण्यासाठी शिंदे, फडणवीस आणि मी आमदारांच्या १५० बैठका घेतल्या,” आमदाराचा मोठा गोप्यस्फोट