पुणे : भाजपच्या अध्यक्षांनी प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही. ते शिल्लक राहणार नाहीत आणि आमचा एकच भाजपा पक्ष देशात शिल्लक राहिल. नितीश कुमारांची तक्रार आहे. तीच तक्रार ही अकाली दलाची आणि इतर मित्र पक्षांची आहे. भाजपा त्यांच्यासोबत असलेल्या मित्र पक्षांना हळूहळू संपवत आहे. अशी टिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“शिंदेंसोबत ४०-५० आमदार गेले, त्या सर्वांनाच मंत्री व्हायचे, पण…;”
महाराष्ट्रात शिवसेना आमच्यासोबत होती. पण त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे खरी शिवसेना आमच्यासोबत आली. आता शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. त्यांच्यासोबत 50 आमदार आहेत. तरीही भाजपने त्यांना मंत्रिपद दिले. काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यामध्ये त्यांच्या आणि आमच्या प्रत्येकी 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांचे दुख वेगळे आहे. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 15 महिला आमदार; पुढच्या टप्प्यात कुणाला मिळणार संधी?
बिहारमध्ये भाजपचे 75 लोक निवडून आले होते. तर संयुक्त जनता दलाचे 42 आमदार निवडून आले होते. तरीही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे भाजप मित्रपक्षांना कधीही धोका देत नाही. शरद पवार यांनी काॅंग्रेस पक्ष सोडला तेव्हा पक्षांतरबंदी कायदाच अस्तित्त्वात नव्हता. आज तो कायदा अस्तत्त्वात आहे. आज कायदे तयार झाले म्हणून शिंदे साहेब म्हणजे शिवसेना कायदेशीर लढाई लढत आहे. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप एकत्र आली होती. मात्र आता काय परिस्थिती आहे. शिवसेनेच्या या मित्र पक्षाने सेनेवर आघात केला. तिकडे नितीश कुमार हे लोकांच्यात मान्याता असेलेले नेते आहेत. मात्र त्यांनी सावध पवित्रा घेत भाजपपासून दुर राहण्याचा निर्णय घेतला. भाजपला दगा दिला म्हणून शिवसेना फोडल्याचे वक्तव्य सुशील मोदी यांनी केले होते. त्यावर शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला.
Read also
- “उशिरा आलेल्यांना पहिल्या पंगतीत अन् पहिले जे आले त्यांना शेवटी”; मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडूंची नाराजी
- “फडणवीसांच्या दोन्ही मांड्यांवर पापाची ओझी शिंदे गटाने ठेवलीय”
- मुतायचं लय वांदे झालेय साहेब….. असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला संजय शिरसाठ यांचं भन्नाट उत्तर
- फडणवीसांचा पहिलाच पुणे दौरा; अन् राष्ट्रवादीला खिंडार, भाजपचं ‘लोटस कमळ ऑपरेशन’ सुरू
- “ED ची अतिरिक्त तुकडी तातडीने महाराष्ट्रातून बिहारला रवाना”