सागंली : सांगली भाजपकडून आज टिळक चौकात, सांगलीच्या पालकमंत्री पदावरून जयंत पाटील काढण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना भरीव अशी मदत त्यांच्याकडून दिली गेली नाही. तसेच, महामारी काळात देखील पालकमंत्री निष्क्रिय ठरले आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला असून, त्यासाठी जयंत पाटील यांच्या विरोधात हे आंदोलन छेडण्यात आले आहे, अशी माहिती भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी सांगितली.
“…तर ईट का जवाब पत्थर से देंगे,” बावनकुळेंचा शिवसेनेला इशारा
जिल्ह्यातील कृष्णा कारखाना निवडणुकीमुळे वाळवा आणि खानापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली. त्यामुळे मोठं नुकसान झालं. यातच जलसंपदा विभागाकडून धरणातील पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन न करण्यात आल्याने, जिल्ह्याला पुराच्या पाण्याचा फटका बसला आणि पुन्हा एकदा छोटे-मोठे व्यापारी, शेतकरी, नागरिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,” असं त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना- भाजपच्या वादाची काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कोल्हे मजा घेत आहेत – सदाभाऊ खोत
कोल्हापूर, सागंली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याला जयंत पाटील न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी त्यांना हटवावं आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः सागंलीचं पालकमंत्री पद स्वीकारावं. तसेच, ‘कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प राबवावा, दुष्काळी भागाला ‘सायपन’ पद्धतीनं पाणी द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनानं आंदोलनाला योग्य प्रतिसाद दिला नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला आहे.
Read Also :
- भावना गवळींना खावी लागणार जेलची हवा, भुजबळांनाही होणार ७ वर्षांची शिक्षा!
- एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला भाजपचा विरोध, राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता
- सोलापुरात वंचितला धक्का बसणार? मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर!
- राणेंच्या अटकेसाठी दबाव टाकल्याचं सिद्ध झाल्यास राजकारणातून सन्यास घेईन – उदय सामंत
- “राजकीय पक्षात मतभेद असतात पण…”, भाजप खासदार गिरीश बापट यांचा राणेंना घरचा आहेर