अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ नुकताच आता संपणार आहे. महापौर पद रिक्त होत असल्याने पुन्हा एकदा आता पालिकेत राजकीय युद्ध बघायला मिळणार आहे. अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा मोठा दबदबा आहे. आमदार जगताप आणि नगर शहर शिवसेनेमध्ये मोठा राजकीय विरोध आहे. अहमदनगरच्या महापौर पदाची निवडणूक आता येत्या पंधरवाड्यात कधीही होऊ शकते. आमदार संग्राम जगताप कोणती राजकीय खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हे पण वाचा, अहमदनगरच्या दुसऱ्या खासदारांवर होणार गुन्हा दाखल? खासदार सुजय विखे पाटलांना गनिमी कावा पडणार महागात
हे पण वाचा, अहमदनगरच्या महापौर पदासाठी शिवसेना खासदार सुजय विखेंच्या दारी
अहमदनगर महानगर पालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले होते. स्वर्गीय. आमदार अनिलभैया राठोड यांचे सुपुत्र युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांना मानणारा नगरसेवकांचा गट तर दुसरा एक गट अशी परिस्थिती सुरूवातील होती. शहरप्रमुख दिलीप सातपुते आणि संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या मध्यस्तीनंतर गटबाजी थांबविण्यात शिवसेनेला यश प्राप्त झाले आहे. विक्रम राठोड यांच्या गटाच्या महापौर पदाच्या इच्छुक उमेदवार रिता शैलेश भाकरे यांनी निवडणुकीतून अर्ज माघार घेतल्याने नगरसेविका रोहिणी संजय शेंडगे यांचा मार्ग सुकर झाला आहे.
हे पण वाचा, कुकडी सल्लागार समितीच्या पदावरून घनश्याम शेलार यांची हकालपट्टी करा; सरपंच काकासाहेब धांडे यांची मागणी
हे पण वाचा, राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन
याबात त्यांनी थेट पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. सोशल मीडियावर देखील हे पत्र व्हायरल झाले आहे. उमेदवारी बाबत आपण बिनशर्त माघार घेत असल्याचे देखील त्यांनी पत्रात नमूद केले आहे. आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. शिवसेना नगरसेवकांना महापौर शिवसेनेचाच होणार असल्याचा शब्द वरिष्ठांनी दिल्याने आता शिवसेनमध्ये चिंतेचे वातावरण राहिलेले नाही. सगळी दारमोदार आता आमदार संग्राम जगताप कोणाला पाठींबा देणार आणि काय भूमिका घेणार यावर टिकून आहे.
हे पण वाचा,
अहमदनगर मध्ये काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष पेटला
‘‘अहमदनगर जिल्ह्याचे तीन मंत्री काय झोपा काढतात का?’’ राधाकृष्ण विखे पाटलांचा घणाघात
कुकडी, घोड, विसापूर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी तातडीने पाणी मागणी अर्ज भरावेत ; घनश्याम शेलार यांचे शेतकऱ्यांना आवाहन