महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकेल का? यावर राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, सर्वसामाजाला बरोबर घेऊन जाण्याची पवार साहेबांची भूमिका असते. भाजप कुठल्याही शब्दाचं राजकारण करत असते. सरकारमध्ये ताळमेळ नाही, अशी टीका विरोधक करत आहे. मात्र, सरकार 5 वर्षे टिकेल, असा विश्वास आहे. तसेच शब्दांचं राजकारण करून कुणाचेही पोट भरणार नाही, असेही पवार यांनी यांनी यावेळी सांगितलं. अहमदनगरमध्ये रोहित पवार यांच्या ट्रस्टच्या वतीने शासकीय रुग्णालयात रेमडीशिवर हे औषध आणि सेनिटायझर वाटप करण्यात आलं.
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, राज्य सरकार कोरोनाशी लढताना कमी पडत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत मदभेद हळूहळू चव्हाट्यावर येत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष भाजप सरकार टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. सरकारच्या 5 वर्षीय कालखंडाबाबतही सध्या तर्कवितर्क मांडले जात आहे.