मुंबई : कर्जत येथील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वासह सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा काही दिवसांपुर्वी जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण मुंडे यांच्याकडे दिला होता. आज मुंबईत राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. हा कर्जत तालुका भाजपसाठी विशेषत: भाजपचे आमदार राम शिंदेंना मोठा धक्का मानला जात आहे.
प्रवीण दरेकरांना रंगलेल्या गालाचा ‘मुका’ प्रकरण भोवलं; रुपाली चाकणकरांकडून एफआयआर दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत कर्जत तालुक्यातील एक मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. मात्र हा नेता कोण याबाबत नागरिकांमध्येही संभ्रम होता. अखेर कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारपरिषद घेऊन भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक व सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, असे जाहीर केले होते. त्यामुळे राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर आज त्यांनी राष्ट्रवादीत जाहिर प्रवेश केला.
सव्वा रुपयाऐवजी ही रक्कम वाढवायला हवी; चंद्रकात पाटलांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली
राऊत हे गेल्या पंचवीस वर्षांपासून कर्जत ग्रामपंचायत, नगरपंचायतीच्या सत्तेत आहेत. तसेच त्यांच्या पत्नी सुवर्णा राऊत या पंचायत समितीच्या सभापती होत्या. नामदेव राऊत हे मूळचे शिवसैनिक आहेत. नंतर त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नंतर ते भारतीय जनता पक्षात गेले. भाजपमध्ये असतानाच ते नगराध्यक्ष व नंतर उपनगराध्यक्ष झाले.
मी कुठलीही गोष्ट चुकीची केलेली नाही, सोमय्या विनाकारण प्रतिमा मलिन करतायतं – अनिल परब
आता ते आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा माजी मंत्री प्रा. राम शिंदे व खासदार डॉ. सुजय विखे यांना धक्का मानला जात आहे. यापूर्वी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, नगरसेवक बापूसाहेब नेटके, लालासाहेब शेळके, नगरसेविका मनिषा सोनमाळी, सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनमाळी, नितीन तोरडमल आदींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
Read Also :
- महापालिका रणधुमाळी: नाशिकमध्ये 40 प्रभाग तीन सदस्यांचे, एक 2 सदस्यांचा, शिवसेनेत नाराजीचा सुर
- महापालिका रणधुमाळी २०२२: भाजप-राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, काँग्रेसमध्ये मतभेद, आघाडीत बिघाडी कोणाची?
- २०२२ च्या महापालिका निवडणुकासाठी 3 सदस्यांचा प्रभाग होणार; राज्य मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय
- किरीट सोमय्यांचा पुन्हा कोल्हापूरला येण्याचा मुहूर्त ठरला; राजकीय वाद पेटण्याची शक्यता
- उद्धव ठाकरेंचे सल्लागार, अधिकारी अतिशय अपरिपक्व; मुख्यमंत्र्यांच्या पत्रावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक