जालना : ओबीसी आरक्षणावरून राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजपत खडाजंगी सुरु आहे. हे आरक्षण न्यायालयाने स्थगित केलं, कारण ठाकरे सरकारने टाळाटाळ केली, असा आरोप भाजपने केला आहे, तर दुसरीकडे भाजपवर प्रत्येक वेळी ओबीसी समाज व नेत्यांना डावलले जात असल्याचा आरोप आहे.
दरम्यान, यावर भाष्य करताना रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी, “ओबीसी नेत्यांनी दुसऱ्यांच्या घरात न राहता, आता स्वतःचे घर बांधावे, कारण ज्याचे दल त्याचेच बल असते. त्यामुळे, घर बांधून त्यांनी स्वतःच कमांडर व्हावे, डिमांडर राहू नये”, असा सल्ला दिला आहे. सोमवारी पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी, ओबीसींची राष्ट्रीय जनगणना झालीच पाहिजे, अशी पक्षाची भूमिका असल्याचे देखील जाहीर केले.
“पंकजा मुंडे माझी बहीण, तिच्यावर अन्याय झाला असेल तर मला सांगावं, मी बघून घेतो”- महादेव जानकर
तसेच, “जनगणना व्हावी यासाठी वेळप्रसंगी जनआंदोलन उभारून, पण मोदी सरकारला राष्ट्रीय जणगणना करण्यास भाग पाडू”, असा इशारा देत, “ओबीसींच्या जनगणनेसाठी थेट मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून स्वतः या कमिटीचे प्रमुख व्हावे, आघाडी सरकारने ओबीसीचा डाटा तयार केला पाहिजे. जोवर ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपवर निवडणुका होऊ देणार नाही”, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. ओबीसींसाठी रासप २९ तारखेनंतर राज्यभरात जनजागृती अभियान सुरु करणार आहे, अशी माहीतीही त्यांनी दिली.
अमित शहांनी टाळली चंद्रकांत पाटलांची भेट, प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात अधिकच उधाण
दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा राज्यात सुरु झाली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी दिल्ली गाठून वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. यांनतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी, समर्थकांना राजीनामा मागे घेण्याचं आवाहन केलं. या पार्श्वभूमीवर, पंकजा मुंडे माझी बहीण आहे. तिच्यावर अन्याय झाला असेल तर, तिनं मला सांगावं मग मी बघतो”, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा मुंडे यांच्या नाराजीज नाट्यावर चर्चा सुरु झाली आहे.
Read Also :
- “मग हा टाइमपास कशाला?”; सुप्रिया सुळेंवर निलेश राणे यांचा जोरदार घणाघात
- टास्क फोर्सच्या बैठकीत संभाव्य तिसऱ्या लाटेवर चर्चा, यंदाही साधेपणानेच करावे लागणार सण साजरे
- मंत्रालयात झाली गटारी? मोठ्या प्रमाणात सापडल्या दारूच्या बाटल्या…
- “आता भाजपा कार्यकर्त्याला कुणी हात लावला, तर….”, भाजपा नेत्याच्या विधानावरून वादाची ठिणगी
- सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरणात आणखी दोन कारखान्यांचे व्यवहार ईडीच्या रडारवर