पुणे : राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार उपहासात्मक टीका केली आहे. ‘चंद्रकांत पाटील यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्या निखळ मनोरंजन होत आहे. त्यांच्यावर अजितदादांनी करमणूक कर लावावा,’ अशी खोचक टीका त्यांनी जेली आहे. ‘देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात,’ या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांनंतर चाकणकरांनी पाटलांची खिल्ली उडवली आहे.
राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा!
“चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राचे हक्काचे GST चे पैसे देत नाही निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल.”
चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. केंद्रातील भाजप सरकार
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 20, 2021
चंद्रकांत पाटील यांनी, ‘हे महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना, मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता, राष्ट्रवादीकडे गृह खातं देऊ नका,’ असं म्हणाले. त्यांनतर फडणवीस यांनी अजित पवारांसोबत शपथ घेतली, तेव्हा हा सल्ला फडणवीसांना दिला होता का? असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर उत्तर देताना, ‘फडणवीस दबंद नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका. अजित पवारांसोबत शपथ घेणं ही कॅल्क्युलेटेड रिस्क होती,’ असं नमूद केलं.
‘बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढला, तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी’
दरम्यान, कोल्हापूरला जाऊन मुश्रीफ यांचे आणखीन काही घोटाळे बाहेर काढणार,’ असे म्हणणाऱ्या सोमय्या यांना, पोलिसांकरवी त्यांच्या घरीच स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला गेला. त्यांनतर या कारवाईला झुगारून त्यांनी रेल्वेने कोल्हापूर गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांना कराडमधेच गाठून थांबण्याची विनंती केली. रविवारी घडलेल्या या घटनेचे सोमवारी देखील पडसाद उमटत असून, त्यामुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे.
Read Also :
- सोमय्यांवरील कारवाईत पवारांचा हस्तक्षेप? वळसे पाटलांचे स्पष्टीकरण
- शिवसेनेतच जुंपली! कॅबिनेट मंत्र्याने केलेल्या नियुक्त्या आमदाराने केल्या रद्द
- ‘गडहिंग्लज आणि पारनेर साखर कारखान्यात घोटाळे, उद्या ईडीला पुरावे देणार!
- भाजपकडून राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसला आव्हान, दिला नवा उमेदवार
- ‘चप्पल दाखवणं सोप्पं, ईडीला फेस करणं कठीण! तोंडाला फेस येईल’ पाटलांचा टोला